AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला…

Suryakumar Yadav on 3rd t20 : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे. कारण तिसऱ्या सामन्याआधी सूर्याने संघातील सर्व खेळाडूंना एक गोष्ट सांगितली आहे. सामना जिंकायचा असेल तर ती गोष्ट करायलाच हवी असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
Suryakumar Yadav
| Updated on: Dec 13, 2023 | 7:30 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 5 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. सामना सुरू असताना पावसाने खोडा घातला आणि डकवर्थ लुईस नुसार आफ्रिकेच्या संघाला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचां सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा बचाव करताना टीम इंडियाला अपयश आलं होतं. पावसामुळे चेंडू आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बॅटवर चांगला येत होता त्यामुळे टीम इंडियाची गोची झाली होती. अशातच सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यासाठी प्लॅन रेडी असल्याचं सांगितलं आहे.

सूर्या काय म्हणाला?

टीममधील सर्व खेळाडूंना सांगितलं आहे की, मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर पॉवर प्ले चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या पाच ते सहा ओव्हरमध्ये दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली होती. आम्हीसुद्धा अशाच प्रकारचा खेळणार असून तिसऱ्या टी-20 सामन्याची वाट पाहत असल्याचं सूर्या म्हणाला.

आम्ही केलेला स्कोर काही खराब नव्हता मात्र गोलंदाजी करणं आव्हानात्मक झालं होतं. संघातील सहकारी खेळाडूंना कन्मर्ट झोनमधून बाहर पडून खेळावं लागणार असल्याचं सांगितलं. ड्रेसिंग रूममधील वातवरण जर उत्साही असावं. त्यासाठी मैदानावर जे काही होईल ते तिथेच सोडायचं, असं सूर्याने सांगितलं.

दरम्यान, 14 डिसेंबर म्हणजे गुरूवारी हा सामना होणार असून संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला.
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात.
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?.
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!.
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!.