AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला…

Suryakumar Yadav on 3rd t20 : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे. कारण तिसऱ्या सामन्याआधी सूर्याने संघातील सर्व खेळाडूंना एक गोष्ट सांगितली आहे. सामना जिंकायचा असेल तर ती गोष्ट करायलाच हवी असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
Suryakumar Yadav
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 13, 2023 | 7:30 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 5 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. सामना सुरू असताना पावसाने खोडा घातला आणि डकवर्थ लुईस नुसार आफ्रिकेच्या संघाला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचां सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा बचाव करताना टीम इंडियाला अपयश आलं होतं. पावसामुळे चेंडू आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बॅटवर चांगला येत होता त्यामुळे टीम इंडियाची गोची झाली होती. अशातच सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यासाठी प्लॅन रेडी असल्याचं सांगितलं आहे.

सूर्या काय म्हणाला?

टीममधील सर्व खेळाडूंना सांगितलं आहे की, मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर पॉवर प्ले चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या पाच ते सहा ओव्हरमध्ये दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली होती. आम्हीसुद्धा अशाच प्रकारचा खेळणार असून तिसऱ्या टी-20 सामन्याची वाट पाहत असल्याचं सूर्या म्हणाला.

आम्ही केलेला स्कोर काही खराब नव्हता मात्र गोलंदाजी करणं आव्हानात्मक झालं होतं. संघातील सहकारी खेळाडूंना कन्मर्ट झोनमधून बाहर पडून खेळावं लागणार असल्याचं सांगितलं. ड्रेसिंग रूममधील वातवरण जर उत्साही असावं. त्यासाठी मैदानावर जे काही होईल ते तिथेच सोडायचं, असं सूर्याने सांगितलं.

दरम्यान, 14 डिसेंबर म्हणजे गुरूवारी हा सामना होणार असून संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.