
झिम्बाब्वेला मारूमनीच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. पावर प्लेनंतर अक्षर पटेलने पहिलं यश मिळवून दिलं आहे. मारूमनी 20 धावा करून तंबूत परतला आहे.
झिम्बाब्वेने पावर प्लेमध्ये धीमी सुरूवात केली. सहा षटकात एकही गडी न गमवता 44 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड सुरू आहे.
झिम्बाब्वेची टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात धीमी सुरूवात झाली आहे. भारताने पावर प्लेमध्ये पकड मिळवली आहे. भारताने विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं आहे.
झिम्बाब्वेकडून बॅनेट आणि मारूमनी ही जोडी मैदानात उतरली आहे. भारताने विजयासाठी 256 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे ही जोडी कशी सुरूवात करते याकडे लक्ष लागून आहे. कारण आक्रमक खेळी करण्याशिवाय पर्याय नाही.
टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांची विस्फोटक बॅटिंग करत झिंबाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनीही अर्धशतक झळकावलं. तर संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चौघांनीही 20 पेक्षा अधिक धावा करत भारताला 250 पोहचवण्यात योगदान दिलं. त्यामुळे आता टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध किती धावांनी जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने 200 पार मजल मारली आहे. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या ही जोडी मैदानात खेळत आहे. दोघेही जोरदार फटकेबाजी करत आहे. भारताने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित 2 षटकांत आणखी किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
झिंबाब्वेने भारताला चौथा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 13 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.
झिंबाब्वेने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. ओपनर अभिषेक शर्मा अर्धशतक करुन आऊट झाला आहे. अभिषेकने 30 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह एकूण 55 धावा केल्या.
झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा इशान किशन याला आऊट करत भारताला दुसरा झटका दिला आहे. सिकंदरने त्याच्या बॉलिंगवर इशान किशन याला रिचर्ड नगारावा याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने 38 धावा केल्या.
टीम इंडियाने पावरप्ले आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 80 धावा केल्या. इशान किशन 15 तर अभिषेक शर्मा 33 धावांवर नाबाद खेळत आहेत.
झिंबाब्वेने संजू सॅमसन-इशान किशन ही टीम इंडियाची सेट आणि ओपनिंग जोडी फोडली आहे. ब्लेसिंग मुजारबानी याने संजूला रायन बर्ल याच्या हाती कॅच आऊट केलं. संजूने 15 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. भारताने 3.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 48 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा फलंदाज आणि ओपनर संजू सॅमसन याने झिंबाब्वे विरुद्ध अप्रतिम सुरुवात केली आहे. संजूने इशान किशन याच्यासोबत पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जोडल्या. संजूने या दरम्यान 1 सिक्स लगावला. तर एक चौकारही लगावला. मात्र तो चौकार लेग बिफोर असल्याने संजूच्या खात्यात जोडला गेला नाही. मात्र संजूने केलेल्या या सुरुवातीमुळे भारताच्या डग आऊटमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कॅप्टन), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरावा.
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
झिंबाब्वेने सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडिया आता किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सुपर 8 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रॅमी क्रेमर, आशीर्वाद मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, बेन कुरन, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा आणि वेलिंग्टन मसाकादझा.
इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन.
टीम इंडिया आणि झिंबाब्वेची सुपर 8 मध्ये पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे आता दोन्ही संघांसाठी एकमेकांविरूद्धचा सुपर 8 मधील सामना हा करो या मरो असा झाला आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं पॅकअप होईल. तर विजयी संघाचं आव्हान कायम राहिल. त्यामुळे या सामन्यात कोण कशी कामगिरी करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया आणि झिंबाब्वे या दोन्ही संघांनी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियाने साखळी फेरीत सर्वच्या सर्व 4 सामने जिंकले. तर झिंबाब्वेने पावसामुळे रद्द झालेला सामना वगळता इतर 3 सामने जिंकले. मात्र दोन्ही संघ आपल्या सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी झिंबाब्वे आणि भारतासाठी सुपर 8 मधील हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे भारत विरुद्ध झिंबाब्वे या सामन्यात कोण यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.