AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : सुनील गावस्कर Live सामन्यादरम्यान काय बोलून गेले? सोशल मीडियावर संतापाची लाट

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिला दिवस टीम इंडियाच्या फलंदाजांनी गाजवला. यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याने वादळ उठलं आहे.

IND vs WI : सुनील गावस्कर Live सामन्यादरम्यान काय बोलून गेले? सोशल मीडियावर संतापाची लाट
IND vs WI : सुनील गावस्कर Live सामन्यादरम्यान काय बोलून गेले? सोशल मीडियावर संतापाची लाटImage Credit source: PTI
| Updated on: Oct 10, 2025 | 3:42 PM
Share

भारत वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. संघाच्या 58 धावा असताना केएल राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजचे गोलंदाज विकेटसाठी पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळाले. पण सर्व काही टीम इंडियाच्या बाजूने सुरु असताना सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना वापरलेले शब्द क्रीडाप्रेमींच्या मनाला भिडले. त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. सुनील गावस्कर यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर रान उठलं आहे. सुनील गावस्कर यांच्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूची खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. सुनील गावस्कर यांनी सामना सुरु असताना समालोचन करताना टेविन इमलाचची खिल्ली उडवली. नेमकं काय झालं ते समजून घ्या.

सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

भारत वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात इयान बिशप आणि सुनील गावस्कर समालोचन करत होते. यावेळी वेस्ट इंडिजच्या टेविनची खिल्ली उडवली गेली. खरं तर असं वागणं सुनील गावस्कर यांना शोभणारं नाही असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. गावस्कर यांनी बिशप यांना विचारलं की, ‘बिशप मी तुला विचारू इच्छितो की, टेविन वेस्ट इंडिजमध्ये विचित्र नाव आहे. टेविन इमलाच, हाहाहाहा… ज्या लोकांनी या खेळाडूचं नाव ठेवलं ते बोबडे तर नव्हते ना.. ते त्याचं नाव केविन तर ठेवू इच्छित नव्हते ना..’ सुनील गावस्करने केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. क्रीडाप्रेमींनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. इतकंच काय त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून दूर करण्याची मागणी केली आहे.

सुनील गावस्कर यांची अशा प्रकारे वक्तव्य करण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबाबत अशीच कमेंट केली होती. त्यावरून खूपच वाद झाला होता. दरम्यान, सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुनील गावस्कर यांनी याबाबत थेट इयान बिशप यांनाच प्रश्न विचारला की, नव्या चेंडूने वेस्ट इंडिजचे गोलंदाज बाउंसरचा वापर का करत नाहीत. यावर बिशप यांनी काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने बिशप यांनी सांगितलं की, कदाचित तुम्ही पुढे सील्सकडून तशा प्रकारची गोलंदाजी पाहू शकता.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.