AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला असा विजय, 77 वर्षांचा दुष्काळ संपला

भारताने इंग्लंडमध्ये घुसून इंग्रंजांना कसोटीत लोळवलं आहे. खरं तर ही मालिका बरोबरीत सुटली. पण असं असलं तरी भारताच्या दृष्टीने हा मोठा विजयच आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताने फक्त 6 धावांनी विजय मिळवला आणि 77 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणली.

भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला असा विजय, 77 वर्षांचा दुष्काळ संपला
भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला असा विजय, 77 वर्षांचा दुष्काळ संपलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 04, 2025 | 5:30 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रोमहर्षक झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. कारण इंग्लंडला पाचव्या दिवशी 35 धावांची गरज होती आणि हातात 4 विकेट होत्या. त्यामुळे इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार आणि अनेकांना आशा सोडल्या. पण मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्रंजांनी नांगी टाकली. हा सामना भारताने अवघ्या 6 धावांनी जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या विजयासह भारताने 77 वर्षांची दीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात आणली आहे. हा विजय भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरला. कारण इतक्या वर्षानंतर भारताने अशी कामगिरी केली आहे. या विजयामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने मान मिळाला आहे. शुबमन गिल भले नाणेफेक गमवत असेल. पण मालिका बरोबरीत सोडवण्याची धमक आहे.

भारताने विदेश दौऱ्यावर असताना पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने यापूर्वी 16 वेळा विदेशात कसोटी मालिका खेळल्या. पण प्रत्येक वेळी शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण यावेळी तसं काही झालं नाही. भारताने ओव्हल मैदानात इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या मालिकेत भारतीय सं 1-2 ने पिछाडीवर होता. पण चौथा सामना ड्रॉ आणि पाचवा जिंकून दाखवला. शेवटच्या दिवशी इंग्लंडकडे एकूण 4 विकेट होत्या. त्यापैकी 3 विकेट या एकट्या मोहम्मद सिराजने घेतल्या. तर एक विकेट मिळवण्यात प्रसिद्ध कृष्णाला यश आलं. या सामन्यात मोहम्मद सिराजने 9 आणि प्रसिद्ध कृष्णाने 8 विकेट घेतल्या.

दरम्यान, कसोटीत इतक्या कमी फरकाने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2004 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 13 धावांनी विजय मिळवला होता. 1972 मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकात्यात 28 धावांनी, तर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेटमध्ये 31 धावांनी विजय मिळवला होता. एकेरी धावांनी विजय आणि तोही भारताबाहेर पहिल्यांदा मिळवला आहे.दुसरीकडे, इंग्लंडने भारताविरुद्ध 4-1 ने शेवटची कसोटी मालिका 2018 मध्ये जिंकली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.