AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज, स्पष्ट सांगितलं की…

सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना सहज जिंकला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 172 धावा दिल्या होत्या. पण भारताने पॉवर प्लेमध्ये अर्धा खेळ खल्लास केला होता. या विजयानंतरही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाराजी व्यक्त केला.

भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज, स्पष्ट सांगितलं की...
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज, स्पष्ट सांगितलं की...Image Credit source: ACC
| Updated on: Sep 22, 2025 | 1:11 AM
Share

भारत पाकिस्तान सामना म्हंटलं तर मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंनाही टेन्शन असतं. हायव्होल्टेज सामन्यात एखादी चूक घडली तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडू डोळ्यात तेल घालून असतात. पण कधी कधी चुका होतात. त्या चुका पराभवासाठी कारणीभूत ठरतात. सुपर 4 फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असंच घडलं. भारतीय खेळाडूंकडून चुका झाल्या आणि पाकिस्तानने 171 धावांचा डोंगर रचला. खरं तर या धावा त्या खेळपट्टीवर करणं कठीण आहे. संथ गतीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माने झेल सोडला. त्यानंतर कुलदीप यादवने झेल सोडला. या दोन्ही खेळाडूंनी सोडलेल्या झेलमुळे भारताला 75 धावांचा फटका बसला. कारण झेल सोडलेल्या दोन्ही खेळाडूंच्या धावांची बेरीज केली तर तितकी येते. पण अभिषेक शर्माने फलंदाजीत या धावांची भरपाई केली. तसेच भारताच्या विजयात मोलाचा हात दिला. असं असूनही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज आहे. त्याने सामन्यानंतर खंत बोलून दाखवली.

सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सुरुवातीला भारत गोलंदाज करताना काय झालं ते सांगितलं. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘पहिल्या 10 षटकांनंतर खेळाडू शांत होते. ड्रिंक्स घेतल्यानंतर, मी त्यांना सांगितले की आता खेळ सुरू होतो.’ दुबेने आम्हाला परिस्थितीतून बाहेर काढले, असंही सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला. शेवटी त्याने आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच झेल सोडणाऱ्या फलंदाजांना शेलक्या शब्दात सुनावलं. ‘पहिल्या डावानंतर, आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी आज ज्या खेळाडूंना बटर फिंगर्स होते त्यांना ईमेल केले आहे.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या दहा टी20 सामन्यांमध्ये नवव्यांदा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. आता भारताचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. भारताचा शेवटचा सुपर 4 मधील सामना 26 सप्टेंबरला होणार आहे. तर पाकिस्तानसाठी आता करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानला बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. जर पाकिस्तानने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. तर भारत आणि पाकिस्तान संघ 28 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येतील.

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....