AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला…

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी20 मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. भारताने ही मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. तिसरा सामना औपचारिक असला तरी क्लिन स्विप देण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.

भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला...
भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला...Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 26, 2026 | 4:10 PM
Share

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक आहे. मात्र या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली तर आयसीसी क्रमवारीत नक्कीच फायदा होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या टी20 सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरने सलग आठ सामन्यान नाणेफेक जिंकली होती. पण दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला होता. आता पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत नवा प्रवास सुरू केला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘कालच्यासारखीच खेळपट्टी असल्याने आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे असेल. आम्ही एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. संघात दोन बदल, प्रिन्स बाहेर गेल्याने अशोक संघात आला आहे, शिवम दुबेच्या जागी सूर्यांशला संधी मिळाली आहे.’

काय म्हणाला सिकंदर रझा?

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, ‘आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. संघाला कर्णधाराकडून अजून थोड्या धावांची गरज आहे. आशा आहे की माझी आणि संघाची कामगिरी चांगली होईल. आज सकाळी संघात सक्तीचा बदल करण्यात आला आहे, रिचर्ड नगारवाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे वेलिंग्टन मसाकाद्झा खेळत आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

Follow Us
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?