AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. पण सराव सामन्यांच्या तुलनेत मुख्य सामन्यात तेही पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यासमोर खेळणं काहीसं अवघड ठरु शकतं.

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही 'ही' गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत
अजिंक्य रहाणे
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 11:22 PM
Share

T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकाचं (T20 World Cup 2021) यजमानपद भारत अर्थात बीसीसीआयकडे (BCCI) असतानाही कोरोनाच्या संकटामुळे सामने युएई आणि ओमान या देशात खेळवले जात आहेत. आयसीसी आणि बीसीसीआयने मिळून हा निर्णय घेतला आहे. सध्या ग्रुप स्टेजसचे सामने संपले असून त्यातून बांग्लादेश, श्रीलंका, नामिबीया आणि स्कॉटलंड हे संघ सुपर 12 मध्ये गेले आहेत. भारतीय संघाचा (Indian Cricket team) विचार करता भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (india vs pakistan) असणार आहे. दरम्यान भारताचे सामने सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी काही सल्ले देत भारतीय संघाला काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे.

अजिंक्यने इंडिया टुडेच्या सलाम क्रिकेट शोमध्ये माहिती देताना सांगितले की, यूएईत होणाऱ्या सामन्यांमधील विजय आणि पराभवात Dew अर्थात दवबिंदूचा मोठा हात असू शकतो. मागील काही सराव सामने तसेच ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात सातत्याने दव पडल्यामुळे चेंडूच्या हालचाली ही बदलेल्या दिसून येत आहेत. सुरुवातीला फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यात अडचणी येत होत्या. पण दव पडताच चेंडूवरील गोलंदाजाची ग्रीप अर्थात पकड कमी झाल्याने मोठे शॉट खेळणं सोप झालं आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकून वातावरणाच्या हिशोबाने निर्णय़ घेणं योग्य असल्याचं मत रहाणेने दिलं आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून स्कॉटलंड आणि नामिबीया हे दोन संघही याच ग्रुपमध्ये आले आहेत. या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध स्कॉटलंड  (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध नामिबीया (8 नोव्हेंबर)

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दिपक चहर

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup: पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज भारतासाठी धोका, रोहित-विराटची मोठी कसोटी

(Indian Batman ajinkya rahane Says in World Cup t20 matches Toss will play important role due to Dew)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या