T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. पण सराव सामन्यांच्या तुलनेत मुख्य सामन्यात तेही पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यासमोर खेळणं काहीसं अवघड ठरु शकतं.

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही 'ही' गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:22 PM

T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकाचं (T20 World Cup 2021) यजमानपद भारत अर्थात बीसीसीआयकडे (BCCI) असतानाही कोरोनाच्या संकटामुळे सामने युएई आणि ओमान या देशात खेळवले जात आहेत. आयसीसी आणि बीसीसीआयने मिळून हा निर्णय घेतला आहे. सध्या ग्रुप स्टेजसचे सामने संपले असून त्यातून बांग्लादेश, श्रीलंका, नामिबीया आणि स्कॉटलंड हे संघ सुपर 12 मध्ये गेले आहेत. भारतीय संघाचा (Indian Cricket team) विचार करता भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (india vs pakistan) असणार आहे. दरम्यान भारताचे सामने सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी काही सल्ले देत भारतीय संघाला काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे.

अजिंक्यने इंडिया टुडेच्या सलाम क्रिकेट शोमध्ये माहिती देताना सांगितले की, यूएईत होणाऱ्या सामन्यांमधील विजय आणि पराभवात Dew अर्थात दवबिंदूचा मोठा हात असू शकतो. मागील काही सराव सामने तसेच ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात सातत्याने दव पडल्यामुळे चेंडूच्या हालचाली ही बदलेल्या दिसून येत आहेत. सुरुवातीला फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यात अडचणी येत होत्या. पण दव पडताच चेंडूवरील गोलंदाजाची ग्रीप अर्थात पकड कमी झाल्याने मोठे शॉट खेळणं सोप झालं आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकून वातावरणाच्या हिशोबाने निर्णय़ घेणं योग्य असल्याचं मत रहाणेने दिलं आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून स्कॉटलंड आणि नामिबीया हे दोन संघही याच ग्रुपमध्ये आले आहेत. या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध स्कॉटलंड  (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध नामिबीया (8 नोव्हेंबर)

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दिपक चहर

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup: पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज भारतासाठी धोका, रोहित-विराटची मोठी कसोटी

(Indian Batman ajinkya rahane Says in World Cup t20 matches Toss will play important role due to Dew)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.