AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

भारताने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे.

'T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार'
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 9:06 PM
Share

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दोघांचाही यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) हा पहिला सामना असणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेतील भव्य सामन्याआधी अनेक क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज विविध विधानं करत आहेत. यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते जर पाकिस्तान पहिलाच सामना भारताविरुद्ध पराभूत झाली तर सेमीफायनलच्या शर्यतीतूनही ते बाहेर जातील. यावेळी हॉगने त्याच्यामते सेमीफायनलमध्ये पोहोचणारे 4 संघही सांगितले.

एका शोमध्ये ब्रॅड हॉगने माजी भारतीय क्रिकेटर दीप दासगुप्ता यांच्याची बोलताना सांगितले की, ‘जर पाकिस्तान त्यांचा पहिलाच सामना जो भारतासोबत आहे तो पराभूत झाल्यास त्यांच्यासाठी फार अवघड होईल. कारण त्यानंतरचा सामनाही तगड्या न्यूझीलंडशी त्यांचा असणार आहे. तोही सामना अवघड असल्याने दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करणे पाकला अनिवार्य आहे. अन्यथा पाकिस्तानला पुढे जाता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड- हॉग

ब्रॅड हॉगने त्याचा माजी संघ ऑस्ट्रेलियालाबद्दल बोलताना त्यांच यंदा सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं. त्याच्यामते वेस्टइंडीज आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यानंतर जर पाकास्तानने भारताला पराभूत केलं तर तेही सेमीफायनलमध्ये जातील असं मत हॉगने व्यक्त केलं आहे. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारत आमने-सामने आले आहेत. या सर्ववेळी भारतच विजयी झाला आहे.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

(If pakistan looses against india they may not qualify for semi final in t20 world cup says Brad hogg)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.