AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

भारताने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे.

'T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार'
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 9:06 PM
Share

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दोघांचाही यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) हा पहिला सामना असणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेतील भव्य सामन्याआधी अनेक क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज विविध विधानं करत आहेत. यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते जर पाकिस्तान पहिलाच सामना भारताविरुद्ध पराभूत झाली तर सेमीफायनलच्या शर्यतीतूनही ते बाहेर जातील. यावेळी हॉगने त्याच्यामते सेमीफायनलमध्ये पोहोचणारे 4 संघही सांगितले.

एका शोमध्ये ब्रॅड हॉगने माजी भारतीय क्रिकेटर दीप दासगुप्ता यांच्याची बोलताना सांगितले की, ‘जर पाकिस्तान त्यांचा पहिलाच सामना जो भारतासोबत आहे तो पराभूत झाल्यास त्यांच्यासाठी फार अवघड होईल. कारण त्यानंतरचा सामनाही तगड्या न्यूझीलंडशी त्यांचा असणार आहे. तोही सामना अवघड असल्याने दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करणे पाकला अनिवार्य आहे. अन्यथा पाकिस्तानला पुढे जाता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड- हॉग

ब्रॅड हॉगने त्याचा माजी संघ ऑस्ट्रेलियालाबद्दल बोलताना त्यांच यंदा सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं. त्याच्यामते वेस्टइंडीज आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यानंतर जर पाकास्तानने भारताला पराभूत केलं तर तेही सेमीफायनलमध्ये जातील असं मत हॉगने व्यक्त केलं आहे. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारत आमने-सामने आले आहेत. या सर्ववेळी भारतच विजयी झाला आहे.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

(If pakistan looses against india they may not qualify for semi final in t20 world cup says Brad hogg)

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?