AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ खेळाडू माझ्या आणि कर्णधारपदाच्या आड आला, युवराज सिंगचा मोठा दावा

युवराज सिंग भारताचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू होता. 2007 चा टी-20 आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

'हा' खेळाडू माझ्या आणि कर्णधारपदाच्या आड आला, युवराज सिंगचा मोठा दावा
yuvraj Singh
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 6:10 PM
Share

मुंबई : पहिला टी-20 विश्वचषक (T 20 World Cup 2007) त्यात भारताचा अंतिम सामन्यात पाकिस्तानवर (Pakistan) रोमहर्षक विजय. ज्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) कर्णधारपदाखाली पहिला मोठा विजय मिळवलेली ही स्पर्धा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि यादगार आहे. पण भारताचा महान अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) याच स्पर्धेबाबत एक खंत व्यक्त केलीये. ‘या स्पर्धेत मला कर्णधारपद मिळेल असं वाटत होतं. पण मला न देता धोनीला कर्णधारपद देण्यात आलं.’ अशी खंत युवराजने व्यक्त केली आहे. (Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)

युवराज सिंगने 22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. म्हणजे स्पर्धेच्या तब्बल 14 वर्षानंतर युवराजने ही खंत बोलून दाखवली. तो म्हणाला, ”मला या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार होण्याचं स्वप्न होतं. पण धोनीला कर्णधारपद दिल्यामुळे माझ्या कर्णधारपदाच्या स्वप्नाच्या आड धोनी आला”

‘माझ्यासाठी कर्णधार होण्याची चांगली संधी होती’

22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये बोलताना युवी म्हणाला, “T20 विश्वचषकादरम्यान सर्व दिग्गज खेळाडू विश्रांतीवर होते. सर्व तरुण खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे मला कर्णधार केलं जाईल अशी मला आशा होती. पण अचानक एमएस धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली.”

‘नाते मात्र बिघडले नाही’

युवराजसाठी एमएस धोनी कर्णधार होणार हा निर्णय धक्कादायक होता. पण तरीदेखील धोनी आणि त्याच्या नात्यात कडूपणा आला नाही. युवराजने खेळाडू वृत्तीने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी कर धोनीला सपोर्ट केला. धोनी आणि युवराज यांनी मिळून कितीतरी महत्त्वाचे सामने भारताला जिंकवून दिले.

हे ही वाचा :

‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

(Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.