AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : एलिमिनेटर सामन्याआधी 2 स्टार खेळाडूंनी सोडली RCB ची साथ, विराटसेना अडचणीत

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल. पण या सामन्यापूर्वी संघातील दोन मोठे खेळाडू संघ सोडून निघून गेले आहेत.

IPL 2021 : एलिमिनेटर सामन्याआधी 2 स्टार खेळाडूंनी सोडली RCB ची साथ, विराटसेना अडचणीत
royal challengers bangalore
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 11, 2021 | 1:30 PM
Share

दुबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल. पण या सामन्यापूर्वी संघातील दोन मोठे खेळाडू संघ सोडून निघून गेले आहेत. हे दोन्ही खेळाडू आता आयपीएल 2021 मध्ये आरसीबीचा भाग नसतील. यूएईमध्ये आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी त्यांना संघात घेतले होते. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुश्मंता चमीरा (Dushmantha Chameera) अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. टी 20 विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. अशा स्थितीत दोघांनाही आरसीबीच्या बायो बबलमधून मुक्त करण्यात आले आहे. आरसीबीने ट्विट करून ही माहिती दिली. (IPL 2021: Hasaranga, Dushmantha Chameera released by RCB ahead of Eliminator, to join Sri Lanka national team)

वानिंदू हसरंगा याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तो आरसीबीपासून वेगळा झाल्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला, “प्ले ऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला शुभेच्छा. सर्व सहकाऱ्यांचे आणि परिवाराचे मनापासून आभार. कदाचित या वर्षी आम्ही ट्रॉफी जिंकू. हा अनुभव अद्भुत होता. टीम मॅनेजमेंटपासून इतर सर्व काही चांगले होते. येथे आपण सगळे बंधुत्व आणि मैत्रीचे नाते निभावत खेळतो. या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे.”

हसरंगा आणि चामीरा रिप्लेसमेंट म्हणून संघात आले होते

वानिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिरा यांना आरसीबीने आयपीएल 2021 मध्ये बदली खेळाडू म्हणून निवडले होते. त्याने अॅडम झांपा आणि केन रिचर्डसन सारख्या खेळाडूंची जागा घेतली होती. चमीराला एकही सामना खेळता आला नाही. तर हसरंगा दोन सामने खेळला पण त्यात तो काही विशेष करू शकला नाही. त्याच्या पहिल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो एक धाव करुन नाबाद राहिला. गोलंदाजीतही तो काही कमाल करु शकला नाही, दोन्ही सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

वानिंदू हसरंगा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो लेग स्पिन गोलंदाजी करण्यासाठी तसेच खालच्या क्रमांकावर उपयुक्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आयपीएलमध्ये असे काही घडले नाही. पुढील आयपीएलमध्ये त्याच्यावर कोणता संघ बोली लावतो हे पाहावे लागेल.

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(IPL 2021: Hasaranga, Dushmantha Chameera released by RCB ahead of Eliminator, to join Sri Lanka national team)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली