AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : या खेळाडूमुळे विराटचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं, RCB च्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन!

आयपीएल 2021 च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवाबरोबरच बंगळुरुचं यंदाच्या वर्षीही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शेवटच्या सामन्यात बंगळुरुचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळला. पण एका खेळाडूने सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं.

IPL 2021 : या खेळाडूमुळे विराटचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं, RCB च्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन!
Virat Kohli
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 12, 2021 | 8:29 AM
Share

IPL 2021 :  आयपीएल 2021 च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवाबरोबरच बंगळुरुचं यंदाच्या वर्षीही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शेवटच्या सामन्यात बंगळुरुचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळला. पण एका खेळाडूने सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. त्याच खेळाडूने विराटच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आणि आरसीबीच्या पराभवाचा व्हिलन ठरला.

आरसीबीच्या एका खेळाडूमध्ये विराटचं स्वप्न भंगलं

आरसीबीच्या पराभवाचा सर्वात मोठा दोषी अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिश्चन ठरला. ख्रिश्चनने एकाच ओव्हरमध्ये धावांची खिरापत वाटली की त्यानंतर संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. केकेआरच्या डावातील बारावे षटक फेकण्यासाठी ख्रिश्चनने आला. या षटकात ख्रिश्चनचा सामना सुनील नरेनशी झाला. नारायणने ख्रिश्चनला एका षटकात तीन मोठे षटकार मारले आणि तिथेच सामना फिरला. ख्रिश्चनच्या या षटकात नारायणने एकूण 22 धावा फटकावल्या. केकेआरने बंगळुरुच्या हातातला विजय हिसकावून घेतला.

ख्रिश्चनच्या ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर नारायणने 3 सिक्सर ठोकून त्याची धुलाई केली. एकाच ओव्हरमध्ये 22 धावांची खिपारत वाटल्यानंतर आणि सामना हळूहळू बंगळुरुच्या हातून निसटतोय, हे पाहिल्यानंतर विराटचा चेहरा उतरला. यापाठीमागचं मुख्य कारण होतं विराटचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना आणि पुन्हा एकदा आयपीएल जेतेपदाची हुलकावणी…! बंगळुरुने शेवटपर्यंत केकेआरशी झुंज दिली पण ती झुंज अपयशी ठरली. अखेर कोलकात्याने बाजी मारत बंगळुरुला 4 विकेट्सने पराभव केलं.

विराटचं स्वप्न पुन्हा भंगलं

कोलकात्याने दणका दिल्याने पुन्हा एकदा विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. विराट गेल्या 13 वर्षांपासून आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण प्रत्येक वेळी त्याच्या वाट्याला पराभव येतो आहे. बंगळुरुने आतापर्यंत 3 वेळा अंतिम फेरीत धडक मारलीय. परंतु प्रत्येक वेळी विराटने इतर संघाच्या कर्णधारांना ट्रॉफी उंचावताना पाहिलं. यंदाच्या वर्षीही विराटचं स्वप्न तुटलं. आता कर्णधार म्हणून विराट ती ट्रॉफी कधीही उंचावताना दिसणार नाही.

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट सात वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

(IPL 2021 RCB Lost Playoff Match Against KKR Due To Dan Christian Over)

हे ही वाचा :

IPL 2021 : 7 वर्ष कॅप्टन, पण एकही ट्रॉफी नाही, कर्णधारपद सोडताना विराट भावूक, 5 मोठी वक्तव्य करत महत्त्वाची घोषणा

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक