AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Eliminator: LSG vs RCB सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल? जाणून घ्या आज कसं असेल हवामान

IPL 2022 Eliminator: पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामना सुद्धा कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशावेळी तिथे सामने आयोजित करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

IPL 2022 Eliminator: LSG vs RCB सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल? जाणून घ्या आज कसं असेल हवामान
eden garden Image Credit source: PTI
| Updated on: May 25, 2022 | 5:29 PM
Share

मुंबई: IPL 2022 मध्ये लीग स्टेज संपली असून आता प्लेऑफचे (playoff) सामने सुरु झाले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier Matches) विजय मिळून गुजरात टायटन्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कुठला असेल? याचा निर्णय शुक्रवारी होईल. लीगच्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामना सुद्धा कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशावेळी तिथे सामने आयोजित करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन बीसीसीआयने प्लेऑफसाठी काही नवीन नियम बनवले. त्याची माहिती सुद्धा दिली आहे. कालच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. पण सुदैवाने असं घडलं नाही.

पावसाबद्दल हवामान विभागाचा अंदाज काय?

आजचा सामना RCB आणि LSG दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जो संघ हरेल, त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हवामान विभागाने आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. वातावरण स्वच्छ असेल, पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज आहे. तापमान 27 डिग्री ते 36 पर्यंत असेल.

बीसीसीआयचे नवीन नियम

पावसाने व्यत्यय आणला आणि नियमित वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही, तर विजेता सुपरओव्हरमधून ठरवला जाईल. एका षटकाचा खेळही शक्य झाला नाही, तर पॉइंट्स टेबलमध्ये कुठला संघ टॉपवर आहे, त्या आधारावर निकाल लावला जाईल. क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 साठी कुठलाही रिझर्व्ह दिवस ठेवलेला नाही. फायनलसाठी मात्र पावसाने बाधा आणली, तर एक रिझर्व्ह दिवस आहे. 30 मे हा फायनलसाठी राखीव दिवस आहे. रात्री आठवाजता सामना सुरु होईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.