AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामना रद्द? गुणतालिकेत होणार मोठा उलटफेर

DC vs RCB IPL 2023 : आयपीएल 2023 मधील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आहे. मात्र या सामन्याबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामना रद्द? गुणतालिकेत होणार मोठा उलटफेर
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला लागली नजर, कोणाचं नुकसान कोणाचा फायदा जाणून घ्याImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 06, 2023 | 12:38 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. अजूनही कोणत्याच संघाचं काहीच ठरलेलं नाही. एक हार जीत अख्ख्या गुणतालिकेचं गणित बदलू शकतं अशी स्थिती आहे. त्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्याचा थेट परिणाम गुणतालिकेवर दिसून आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाल्याने एक तर दोघांचं नुकसान किंवा दोघांचा थेट फायदा होऊ शकतो. आता अशीच काहीसी स्थिती दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात आहे.

दिल्ली विरुद्ध बंगळुरु हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्व गणित फिस्कटेल असंच चित्र आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारा 16 किमी वेगाने वाहात आहे. तर तापमान 26 ते 41 डिग्री सेल्सियसपर्यंत राहील.

दोन्ही संघांना प्लेऑफसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास बंगळुरु आणि दिल्लीचं नुकसान होणार. खासकरून दिल्लीच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येतील. गुणतालिकेत बंगळुरुचा संघ पाचव्या स्थानी आहे. एका गुणामुळे 11 गुण होतील.

मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याचा काही निकाल लागला तर बंगळुरुचं नुकसान होईल. कारण मुंबई जिंकली तर 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी जाईल. चेन्नई जिंकली तर 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी असेल. त्यामुळे बंगळुरुला मोठा फटका बसू शकतो.

दुसरीकडे बंगळुरुचा नेट रनरेट तितका चांगला नाही. चेन्नई जिंकली तर चौथं स्थान मिळेल. पण मुंबई जिंकली तर मात्र सहा स्थानावर घसरण होईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.