AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : जखमी असूनही ऋषभ पंतनं कशाचीही पर्वा न करता घेतला असा निर्णय, दिल्लीसाठी ठरणार संकटमोचक

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची सर्वात वाईट आहे. सलग चार सामने गमावल्याने दिल्लीची अवस्था बिकट आहे.त्यामुळे अखेर ऋषभ पंतनं संघासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 : जखमी असूनही ऋषभ पंतनं कशाचीही पर्वा न करता घेतला असा निर्णय, दिल्लीसाठी ठरणार संकटमोचक
| Updated on: Apr 14, 2023 | 9:56 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी अपघात झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ऋषभ पंत क्रिकेट मैदानापासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाची स्थिती एकदम वाईट झाली आहे. दिल्लीनं आयपीएल 2023 स्पर्धेतील सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे पाचवा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल असं चित्र आहे. त्यामुळे आरसीबी विरुद्धचा सामना खूपच महत्ताचा ठरणार आहे. आता ही स्थिती पाहता ऋषभ पंतने संघासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी ऋषभ पंत बंगळुरुला आला आहे. दिल्लीपासून 2 हजार किमी लांब असलेल्या चिन्नास्वामी मैदानात पोहोचला आहे. इतकंच काय तर ट्रेनिंग सेशनमध्येही हजेरी लावली. ऋषभ पंतने सामन्यापूर्वी संघाचं मनोबळ वाढवलं.

ऋषभ पंत यापूर्वी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही मैदानात पोहोचला होता. पण या सामन्यात गुजरातकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात गुजरातने 6 गडी आणि 11 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी, तर चौथ्या सामन्यात मुंबईने 6 गडी राखून पराभूत केलं.

बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला 8 गडी आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याने 81 धावांनी, तर लखनऊने 1 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे चौथा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 27 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापीकी बंगळुरुने 16 आणि दिल्लीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा