AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईटर रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाचे चाहते आपलाच संघ विजयी होणार असा दावा करत आहे. मात्र या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर जेतेपद कोणाला मिळणार? ते जाणून घ्या

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2024 | 2:25 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील 74 वा सामना अर्थात अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. जेतेपदासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या दोन एक संघ जेतेपद मिळवणार हे आता नक्की झालं आहे. पण या सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्याता आहे. हा पाऊस सामन्यादरम्यात कायमही राहू शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर निकाल कसा लागणार? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. अंतिम सामन्यात नाणेफेकीला पावसामुळे उशीर झाला तर षटकं कापली जाणार नाहीत. सामना सुरु होण्याता 9.40 पर्यंतचा वेळ झाला तरी 20 षटकं पूर्ण होतील. त्यामुळे दोन्ही संघांना पूर्ण 20 षटकांचा खेळ खेळता येईल. पण हा सामना 9.40 नंतर सुरु झाला तर मात्र षटकं कमी केली जातील. प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक वजा होईल.

अंतिम सामन्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त अवधी दिला आहे. आयपीएल सामन्याची नियोजित वेळ ही 3 तास 15 मिनिटांची आहे. पावसामुळे किंवा इतर कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला तर अतिरिक्त दोन तास वापरले जातील. म्हणजेच अंतिम फेरीचा सामना संध्याकाळी 7.30 ते 1 या वेळेत होणार आहे. जर सामना या वेळेत पूर्ण झाला नाही तर राखीव दिवस वापरला जाईल. राखीव दिवशी सामना पूर्णपणे नव्याने खेळला जाईल. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामना मध्यातच रद्द झाला तरी राखीव दिवशी नव्याने टॉससह सुरु होईल.

राखीव दिवशीही पाऊस पडला तर अतिरिक्त 2 तास मिळतील. रात्री 11.56 मिनिटांनी सामना सुरु करण्याची वेळ आली तर हा सामना 5 षटकांचा होईल. तसेच सामना 12.56 ला संपेल की नाही याची चाचपणी सामनाधिकारी करतील. जर यात पाच षटकांचा खेळ पूर्ण होणार नसेल. तर मग सुपर ओव्हरने अंतिम सामन्याचा निकाल दिला जाईल. पण सुपर ओव्हरही शक्य झाली नाही तर मात्र अंतिम फेरीचा सामना रद्द केला जाईल. सामन्याचा निकाल साखळी फेरीतील कामगिरीवर दिला जाईल. अर्थात याचा फायदा सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघाला होईल. तो संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स..तर सनरायझर्स हैदराबादला उपविजेतेपदावर सामाधान मानावं लागेल.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?