AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईटर रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाचे चाहते आपलाच संघ विजयी होणार असा दावा करत आहे. मात्र या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर जेतेपद कोणाला मिळणार? ते जाणून घ्या

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2024 | 2:25 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील 74 वा सामना अर्थात अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. जेतेपदासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या दोन एक संघ जेतेपद मिळवणार हे आता नक्की झालं आहे. पण या सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्याता आहे. हा पाऊस सामन्यादरम्यात कायमही राहू शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर निकाल कसा लागणार? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. अंतिम सामन्यात नाणेफेकीला पावसामुळे उशीर झाला तर षटकं कापली जाणार नाहीत. सामना सुरु होण्याता 9.40 पर्यंतचा वेळ झाला तरी 20 षटकं पूर्ण होतील. त्यामुळे दोन्ही संघांना पूर्ण 20 षटकांचा खेळ खेळता येईल. पण हा सामना 9.40 नंतर सुरु झाला तर मात्र षटकं कमी केली जातील. प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक वजा होईल.

अंतिम सामन्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त अवधी दिला आहे. आयपीएल सामन्याची नियोजित वेळ ही 3 तास 15 मिनिटांची आहे. पावसामुळे किंवा इतर कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला तर अतिरिक्त दोन तास वापरले जातील. म्हणजेच अंतिम फेरीचा सामना संध्याकाळी 7.30 ते 1 या वेळेत होणार आहे. जर सामना या वेळेत पूर्ण झाला नाही तर राखीव दिवस वापरला जाईल. राखीव दिवशी सामना पूर्णपणे नव्याने खेळला जाईल. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामना मध्यातच रद्द झाला तरी राखीव दिवशी नव्याने टॉससह सुरु होईल.

राखीव दिवशीही पाऊस पडला तर अतिरिक्त 2 तास मिळतील. रात्री 11.56 मिनिटांनी सामना सुरु करण्याची वेळ आली तर हा सामना 5 षटकांचा होईल. तसेच सामना 12.56 ला संपेल की नाही याची चाचपणी सामनाधिकारी करतील. जर यात पाच षटकांचा खेळ पूर्ण होणार नसेल. तर मग सुपर ओव्हरने अंतिम सामन्याचा निकाल दिला जाईल. पण सुपर ओव्हरही शक्य झाली नाही तर मात्र अंतिम फेरीचा सामना रद्द केला जाईल. सामन्याचा निकाल साखळी फेरीतील कामगिरीवर दिला जाईल. अर्थात याचा फायदा सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघाला होईल. तो संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स..तर सनरायझर्स हैदराबादला उपविजेतेपदावर सामाधान मानावं लागेल.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.