IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईटर रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाचे चाहते आपलाच संघ विजयी होणार असा दावा करत आहे. मात्र या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर जेतेपद कोणाला मिळणार? ते जाणून घ्या

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 2:25 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 74 वा सामना अर्थात अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. जेतेपदासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या दोन एक संघ जेतेपद मिळवणार हे आता नक्की झालं आहे. पण या सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्याता आहे. हा पाऊस सामन्यादरम्यात कायमही राहू शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर निकाल कसा लागणार? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. अंतिम सामन्यात नाणेफेकीला पावसामुळे उशीर झाला तर षटकं कापली जाणार नाहीत. सामना सुरु होण्याता 9.40 पर्यंतचा वेळ झाला तरी 20 षटकं पूर्ण होतील. त्यामुळे दोन्ही संघांना पूर्ण 20 षटकांचा खेळ खेळता येईल. पण हा सामना 9.40 नंतर सुरु झाला तर मात्र षटकं कमी केली जातील. प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक वजा होईल.

अंतिम सामन्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त अवधी दिला आहे. आयपीएल सामन्याची नियोजित वेळ ही 3 तास 15 मिनिटांची आहे. पावसामुळे किंवा इतर कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला तर अतिरिक्त दोन तास वापरले जातील. म्हणजेच अंतिम फेरीचा सामना संध्याकाळी 7.30 ते 1 या वेळेत होणार आहे. जर सामना या वेळेत पूर्ण झाला नाही तर राखीव दिवस वापरला जाईल. राखीव दिवशी सामना पूर्णपणे नव्याने खेळला जाईल. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामना मध्यातच रद्द झाला तरी राखीव दिवशी नव्याने टॉससह सुरु होईल.

राखीव दिवशीही पाऊस पडला तर अतिरिक्त 2 तास मिळतील. रात्री 11.56 मिनिटांनी सामना सुरु करण्याची वेळ आली तर हा सामना 5 षटकांचा होईल. तसेच सामना 12.56 ला संपेल की नाही याची चाचपणी सामनाधिकारी करतील. जर यात पाच षटकांचा खेळ पूर्ण होणार नसेल. तर मग सुपर ओव्हरने अंतिम सामन्याचा निकाल दिला जाईल. पण सुपर ओव्हरही शक्य झाली नाही तर मात्र अंतिम फेरीचा सामना रद्द केला जाईल. सामन्याचा निकाल साखळी फेरीतील कामगिरीवर दिला जाईल. अर्थात याचा फायदा सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघाला होईल. तो संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स..तर सनरायझर्स हैदराबादला उपविजेतेपदावर सामाधान मानावं लागेल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.