AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | “आज तो दिवस आहे जेव्हा…”, रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर ती पोस्ट व्हायरल

Rohit Sharma Mumbai Indians Captaincy | रोहित शर्मा याच्याकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Rohit Sharma | आज तो दिवस आहे जेव्हा..., रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर ती पोस्ट व्हायरल
| Updated on: Dec 15, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई | आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिने बाकी आहेत. त्याआधी दुबईत लिलाव पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याआधी कॅप्टन बदलला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून ती जबाबदारी हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. हार्दिक पंड्या याला काही दिवसांपूर्वीच ट्रान्सफर विंडोद्वारे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आलं. आता त्यानंतर थेट रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला एक नाही, दोन नाही, तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमातही प्लेऑफपर्यंत मजल मारली. कर्णधार कसा असावा याचं उत्तर आदर्श हा रोहितने घालून दिला होता. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सला एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवलं होतं. आयपीएल 2024 ऑक्शनची तयारी सुरु असताना अचानक कॅप्टन बदलण्याच्या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

“कोळश्याच्या शोधात मुंबई इंडियन्सने हिरा गमावला”, अशा आशयाची पोस्ट हार्दिक आणि रोहितच्या फोटोसह सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. तसेच एका नेटकऱ्याने रोहित शर्माचे आयपीएल ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट करत म्हटलंय की “आज तो दिवस आहे जेव्हा मला रोहित शर्माबद्दल वाईट वाटलेच तर अश्रूही आले. मी रोहितचा नुकताच चाहता झालो होतो. त्याला इतक्या लवकर आयपीएलमधील कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी काय केले नाही, त्याने पाच ट्रॉफी जिंकून दिल्या. तरीही त्याला दूधातील माशीप्रमाणे काढण्यात आला. एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, भांडवलशाहीला फक्त नफा समजतो भावना नाही.”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

ती पोस्ट व्हायरल

3 वर्षांपासून प्रतिक्षा

दरम्यान मुंबई इंडियन्सची गेल्या 3 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. मुंबई इंडियन्सला 2021 मध्ये प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. पलटण 2022 साली पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होती.

‘कोळश्याच्या नादात हिरा गमावला’

तर गेल्या हंगामात मुंबईने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी ही हार्दिकच्या खांद्यावर असणार आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?