AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs KKR: रियान परागसमोर आता अजिंक्य रहाणेच्या टीमचं आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. असं असताना मागची आकडेवारी पाहता या दोन्ही संघांची कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात..

RR vs KKR: रियान परागसमोर आता अजिंक्य रहाणेच्या टीमचं आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 25, 2025 | 6:47 PM
Share

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी आतुर असतील. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 7 विकेटने पराभूत केले. तर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स संघाची पिसं काढली. सर्वाधिक धावसंख्या असलेल्या सामन्यात 44 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वसुली दुसऱ्या सामन्यात करण्याचा मानस दोन्ही संघांचा आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ किती वेळा आमनेसामने आले आहेत आणि कोणत्या संघाचं पारडं जड राहिलं आहे ते जाणून घेऊयात

आतापर्यंत आयपीएल इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 29 वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणजे दोन्ही तूल्यबळ आहेत असाच अर्थ निघत आहे. तर एक सामना निकालाविना संपला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार होते. पण पावासामुळे हा सामना झाला नाही. त्यामुळे हेड टू हेड आकडेवारी पाहता या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण 4 सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला एकदा विजय मिळाला आहे. तर धावांचा पाठलाग करताना दोन विजय आहेत. तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. नाणेफेक जिंकणारी टीम इथे एकही सामना जिंकली नाही हे विशेष आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.