AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI: टॉस होताच दहशतवादी हल्ल्यावर पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्याने केलं विधान, म्हणाले…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 41वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

SRH vs MI: टॉस होताच दहशतवादी हल्ल्यावर पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्याने केलं विधान, म्हणाले...
पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 23, 2025 | 7:43 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयानंतर प्लेऑफचं शर्यतीचं चित्र बदलणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल झाला आणि मुंबई इंडियन्सने जिंकला. हार्दिक पांड्याने काय घेणार? हे सांगण्यापूर्वीच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. हार्दिक पांड्या म्हणाला की’सर्वप्रथम मी दहशतवादी हल्ल्यातील मृतांबद्दल शोक व्यक्त करतो. आम्ही एक संघ म्हणून आणि एक फ्रँचायझी म्हणून अशा कोणत्याही हल्ल्यांचा निषेध करतो.’ असं सांगितल्यानंतर हार्दिक पांड्याने काय निवडणार त्याबाबत भाष्य केलं. ‘आम्ही आज रात्री प्रथम गोलंदाजी करू. हा ट्रॅक चांगला दिसतोय, आमच्या संघात फक्त एक बदल आहे. अश्विनीची जागा विघ्नेशने घेतली आहे. आपल्याला फक्त आपल्या योजना अंमलात आणाव्या लागतील आणि खेळ शक्य तितका सोपा करायचा असेल, योग्य नियोजन करावे लागेल.’

हार्दिक पांड्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे, आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.’ संघात एक बदल केल्याचं त्याने सांगितलं. संघात जयदेव उनाडकटला घेतलं आहे. तर मोहम्मद शमी हा इम्पॅक्ट प्लेयर असणार आहे. या सामन्यात डीजे, चीअर्सलीडर्स आणि फटक्यांची आतषबाजी असं काहीच होणार नाही. तर हाताला काळ्या पट्ट्या बांधून सर्व खेळाडू आणि पंच मैदानात उतरले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांचा नांग्या ठेचण्याची मागणी होत आहे. असं असताना उच्च पातळीवर जोर बैठका सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसात मोठं काही तरी होणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय