AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 44व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. यासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की...
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2026 | 11:21 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरूच आहे. या स्पर्धेतील सातव्या पराभवाची नोंद केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचं आशा धूसर झाल्या आहेत. आता प्लेऑफचं गणित रामभरोसे असणार आहे. खरं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर 16 गुणांचं गणित सुटणं आवश्यक असतं. पण सातव्या पराभवानंतर आता हे गणित काही सुटणार नाही. आता स्पर्धेत मुंबई इंडियन्सला फक्त पाच सामने खेळायचे आहे. या पाच सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील. त्यामुळे उर्वरित पाच सामने औपचारिकता असणार आहे. असं असताना सातव्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘हा हंगाम आमच्यासाठी योग्य नव्हता. ते अधिक चांगला खेळले, त्यांनी अधिक चांगली गोलंदाजी केली, त्यांनी अधिक चांगले क्षेत्ररक्षण केले आणि त्यांनी अधिक चांगली फलंदाजी केली. 180-190 ही एक चांगली धावसंख्या असायला हवी होती. आम्हाला लय साधता आली नाही. हा सामना अधिक विचारपूर्वक खेळण्यावर अवलंबून होता. एकंदरीत, गोलंदाजी विभागात ते सरस होते आणि फलंदाजी विभागात आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले नव्हतो. आमच्याकडे गोलंदाजीचे जे पर्याय होते, तेच आम्ही वापरले.’ आता एखादा चमत्कार घडला तरच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते. पण हे गणित जर तरचं आहे. सद्यस्थिती पाहता ते कठीण दिसत आहे.

आयपीएल स्पर्धेतील टॉप 4 मध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहे. पंजाब किंग्सच्या पारड्यात 8 सामन्यानंतर 13 गुण आहेत. तर आरसीबीचे 9 सामन्यात 12, सनरायझर्स हैदराबादचे 9 सामन्यात 12 गुण आणि राजस्थान रॉयल्सचे 10 सामन्यात 12 गुण आहे. या टॉपच्या चार संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर मुंबईचं टॉप 4 मधून आऊट होईल. त्यामुळे आता या संघांच्या प्रत्येक विजयावर या संघाची स्पर्धेतील टॉप 4 मधील एक जागा जाईल.

Follow Us
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल