AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 44व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. यासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की...
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2026 | 11:21 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरूच आहे. या स्पर्धेतील सातव्या पराभवाची नोंद केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचं आशा धूसर झाल्या आहेत. आता प्लेऑफचं गणित रामभरोसे असणार आहे. खरं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर 16 गुणांचं गणित सुटणं आवश्यक असतं. पण सातव्या पराभवानंतर आता हे गणित काही सुटणार नाही. आता स्पर्धेत मुंबई इंडियन्सला फक्त पाच सामने खेळायचे आहे. या पाच सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील. त्यामुळे उर्वरित पाच सामने औपचारिकता असणार आहे. असं असताना सातव्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘हा हंगाम आमच्यासाठी योग्य नव्हता. ते अधिक चांगला खेळले, त्यांनी अधिक चांगली गोलंदाजी केली, त्यांनी अधिक चांगले क्षेत्ररक्षण केले आणि त्यांनी अधिक चांगली फलंदाजी केली. 180-190 ही एक चांगली धावसंख्या असायला हवी होती. आम्हाला लय साधता आली नाही. हा सामना अधिक विचारपूर्वक खेळण्यावर अवलंबून होता. एकंदरीत, गोलंदाजी विभागात ते सरस होते आणि फलंदाजी विभागात आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले नव्हतो. आमच्याकडे गोलंदाजीचे जे पर्याय होते, तेच आम्ही वापरले.’ आता एखादा चमत्कार घडला तरच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते. पण हे गणित जर तरचं आहे. सद्यस्थिती पाहता ते कठीण दिसत आहे.

आयपीएल स्पर्धेतील टॉप 4 मध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहे. पंजाब किंग्सच्या पारड्यात 8 सामन्यानंतर 13 गुण आहेत. तर आरसीबीचे 9 सामन्यात 12, सनरायझर्स हैदराबादचे 9 सामन्यात 12 गुण आणि राजस्थान रॉयल्सचे 10 सामन्यात 12 गुण आहे. या टॉपच्या चार संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर मुंबईचं टॉप 4 मधून आऊट होईल. त्यामुळे आता या संघांच्या प्रत्येक विजयावर या संघाची स्पर्धेतील टॉप 4 मधील एक जागा जाईल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा