AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जर्सी बदलणार, कारण की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 26व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात आरसीबी हिरव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. नेमकं असं का ते जाणून घ्या..

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जर्सी बदलणार, कारण की..
IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जर्सी बदलणार, कारण की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2026 | 10:02 PM
Share

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी घोडदौड सुरू आहे. आता सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला तर गुणतालिकेत पहिलं स्थान गाठणार आहे. त्यामुळे हा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.कर्नाटकचे केएल राहुल आणि करूण नायर हे दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार आहेत. असं असताना सामन्यात आरसीबीचा संघ नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. आरसीबी संघ या सामन्यात हिरवी जर्सी घालून मैदानात उतरेल. 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा ट्रेंड फॉलो करत आहे. त्या मागे कारणंही तसंच आहे. चाहत्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आरसीबी ही हिरवी जर्सी घालते.

आयपीएल 2011 पासून आरसीबीने प्रत्येक पर्वात हिरवी जर्सी परिधान करून एक सामना खेळला आहे. यंदाचं हे 16वं वर्ष आहे. आरसीबी संघाची नवीन जर्सी खूपच आकर्षक आहे. या जर्सीच्या टी-शर्टमध्ये हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे. हिरव्या जर्सीतील आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.आरसीबीने आतापर्यंत हिरवी जर्सी घालून 15 सामने खेळले आहेत. आरसीबीने यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 9 सामने गमावले आहेत. उर्वरित 1 सामना अनिर्णित राहिला. मागील हंगामात राजस्थानविरुद्ध हिरव्या जर्सीत खेळलेल्या आरसीबीने मोठा विजय नोंदवला होता.

हिरव्या जर्सीमधील आरसीबीची कामगिरी आकडेवारीवरून खूपच खराब असल्याचं दिसत आहे. पण याच जर्सीमधील विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी प्रभावी आहे. त्याने आतापर्यंत हिरव्या जर्सीमध्ये त्याने 14 सामने खेळून एकूण 502 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध विराट कोहलीने 109 धावांची खेळी केली होती.

आरसीबीचे सीईओ राजेश मेनन म्हणाले, “एक प्रमुख क्रिकेट फ्रँचायझी म्हणून कार्बन-न्यूट्रॅलिटी साध्य करणे सोपे नव्हते. यासाठी अनेक वर्षांची मेहनत आहे. आमची हिरवी जर्सी निसर्गाप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवते. आम्हाला आशा आहे की, हे पाऊल पाहून आमचे लाखो चाहतेसुद्धा पर्यावरणाबद्दल जागरूक होतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील.”

Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.