AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केलं. पण या सामन्यात एक चूक झाली नसती तर या सामन्याचा निकाल काही वेगळा असता. ज्या चेंडूवर लखनौचा विजय झाला, त्यावर अपील न करणं हैदराबादला महागात पडलं.

IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! VideoImage Credit source: PTI
| Updated on: Apr 06, 2026 | 3:11 PM
Share

LSG vs SRH: आयपीएल स्पर्धेत प्रत्येक चेंडू, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धावेचं महत्त्व आहे. त्यामुळे एखादा निर्णय चुकलं तर पराभवाच्या वेशीवर जाऊन उभं राहावं लागतं. असंच काहीस लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात झालं. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 5 विकेट राखून जिंकला. तसेच या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. पण हा निकाल काही वेगळा असू शकला असता. जर सनरायझर्स हैदराबादने तशी चूक केली नसती तर… सोप्या भाषेत सांगायचं तर जो सामना लखनौ सुपर जायंट्सने जिंकला, तो सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला असता. लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूने विजयी फटक्यावर अपील केली असती.. तुम्ही म्हणाल की विजयी फटक्यावर काय अपील केली असती? लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूने अशी कोणती मोठी चूक केली? वगैरे प्रश्न पडले असतील. शेवटच्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंतने चौकार मारला आणि विजय मिळवून दिला. मग झालं तरी काय? चला जाणून घेऊयात सविस्तर

नेमकं काय घडलं विजयी चौकारावर?

लखनौ सुपर जायंट्स संघाला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. जयदेव उनाडकट गोलंदाजी टाकण्यासाठी आला होता आणि समोर ऋषभ पंत होता. त्याने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे 4 चेंडूत 1 धाव अशी स्थिती आली. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. 2 चेंडूत 1 धाव अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर ऋषभ पंतने चौकार मारला आणि विजय मिळवून दिला. पण लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानकडून मोठी चूक झाली. या चुकीचं रुपांतर हैदराबादच्या विजयात झालं असतं. पण अपील न केल्याने फटका बसला आणि पराभव सहन करावा लागला.

ऋषभ पंतने जयदेवच्या पाचव्या चेंडूवर विजयी चौकार मारला तेव्हा बाउंड्री बाहेर उभ्या असलेल्या आवेश खानने मोठी चूक केली. त्याने चेंडू बाउंड्री पर करण्यापूर्वीच चेंडू बॅटने अडवला. पण ही चूक सनरायझर्स हैदराबादच्या लक्षात आली नाही. आयसीसी कोड ऑफ कंडक्ट 20.1 नियमानुसार, नॉन फिल्डरने दखल दिल्यानंतर चेंडू निर्धाव दिला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियम 41 नुसार ही कृती चुकीची मानली जाते. या बदल्यानंतर पंच सनरायझर्स हैदराबादला 5 धावांची पेनल्टी गिफ्ट करू शकले असते. जर असं झालं असतं तर शेवटच्या चेंडूवर लखनौला 6 धावा कराव्या लागल्या असत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार मारणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने हातातली संधी घालवली असं म्हणायला हकरत नाही.

Follow Us
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा.
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय.
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......