AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: IPL मध्ये खेळण्यास दिला नकार, तरीही खेळाडूला मिळतो पैसा? की बसतो दणका?

IPL Auction Amount: इंडियन प्रीमियम लीगमध्ये खेळाडूंची कोट्यवधींची बोली लागते. पण एकदा खेळाडूची विक्री झाली आणि त्याने खेळण्यास नकार दिल्यावर त्याला लिलावाची सर्व रक्कम मिळते का? काय आहे याविषयीचा नियम, वाचून तुम्हाला बसेल मोठा धक्का...

GK: IPL मध्ये खेळण्यास दिला नकार, तरीही खेळाडूला मिळतो पैसा? की बसतो दणका?
आयपीएल लिलाव
| Updated on: Jan 06, 2026 | 4:41 PM
Share

IPL Auction Amount: IPL च्या लिलावात कोट्यवधींची बोली लागते. खेळाडू रात्रीतून स्टार होतात. आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतो. खेळाडू श्रीमंत होतात. विजेता संघ मालामाल होतो. हे मोठे अर्थचक्र आहे. अशावेळी एखाद्या खेळाडूने लिलावानंतर अचानक खेळण्यास नकार दिला तर? मग त्याला लिलावाची रक्कम परत मिळते का? का त्याला दट्ट्या मिळतो. त्याचे नुकसान होते. काय आहे याविषयीचा नियम? तुम्हाला माहिती आहे का?

1. इंडियन प्रीमियर लीग हे पूर्णपणे BCCI संचालित आहे. जेव्हा एखादा खेळाडू IPL लिलावासाठी त्याचे नाव देतो, तेव्हा त्याला नियम आणि अटींचा स्वीकार करावा लागतो. लिलावात विक्री झाल्यानंतर आणि फ्रँचाईजने त्यांच्याशी करार केल्यानंतर ते बांधले जातात. त्यामुळे मग खेळाडूवर खेळण्यासाठी तयार राहाणे आणि मैदानात उतरणे ही मोठी जबाबदार असते.

2.जेव्हा खेळाडू कोणत्याही ठोस अथवा वैध कारणाशिवाय IPL खेळण्यास नकार देतो, तेव्हा त्याला निलामीची पूर्ण रक्कम देण्यात येत नाही. IPL मध्ये ‘नो प्ले, नो पे’ म्हणजे खेळणार नाही तर मोबदला नाही हा नियम लागू होतो. याचा अर्थ खेळाडू मैदानावर उतरला नाही तर त्याला पैसे मागण्याचा अधिकार नसतो.

3.BCCI च्या नियमानुसार, लिलावात एकदा विक्री झाल्यावर नाव परत घेणे नियमांचे गंभीर उल्लंघन मानल्या जाते. अशा प्रकरणात मग त्या खेळाडूवर पुढील दोन IPL हंगाम आणि लिलाव प्रक्रियेसाठी त्याच्यावर प्रतिबंध घातल्या जाऊ शकतो. हा प्रतिबंध एक शिक्षाच नाही तर एक स्पष्ट संदेश आहे.

4.पण काही प्रकरणात खेळाडूंना शिक्षा नाही तर सवलतही देण्यात आली आहे. जेव्हा खेळाडूला मोठी इजा होते. त्याला दुखापत होते अथवा त्याला राष्ट्रीय संघात खेळणे गरजेचे असते अशावेळी आयपीएलमधून बाहेर पडण्यास त्याला सवलत देण्यात येते. अर्थात त्यासंबंधीचे सज्जड पुरावे त्याला सादर करावे लागतात.

5.IPL सामन्यांसाठी प्रत्येक टीम एक रणनीती आखते. पण जेव्हा खेळाडू मोठी रक्कम घेऊन खेळण्यास नकार देतो. तेव्हा मग टीम आणि फ्रँचाईजचे मोठे नुकसान होते. BCCI च्या कडक नियम नुकसान टाळण्यासाठीच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे टीमचे नुकसान होत नाही. पण अनेकदा काही कारणांसाठी खेळाडूंना या नियमातून सवलत देण्यात आल्याचेही दिसले आहे. आता लवकरच आयपीएल 2026 चा हंगाम येणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशाच्या खेळाडूवरून वाद पेटलेला आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.