IND vs AUS Final | अहमदाबादच्या प्रेक्षकांनी टीम इंडियाला हरवलं का? पॅट कमिन्स काय म्हणाला?

IND vs AUS Final | टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 मधील फायनलचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममधील प्रेक्षकांमुळे गमवावा लागला का? सोशल मीडियावर ही चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने सामना संपल्यानंतर जे वक्तव्य केलं ते सुद्धा याच संदर्भात आहे.

IND vs AUS Final | अहमदाबादच्या प्रेक्षकांनी टीम इंडियाला हरवलं का? पॅट कमिन्स काय म्हणाला?
Ind vs Aus FinalImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 12:51 PM

IND vs AUS Final | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने होते. 1 लाख 30 हजार या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता आहे. वर्ल्ड कपची फायनल भारतात होत असल्याने अपेक्षा होती की, टीम इंडियाला फुल सपोर्ट असेल. आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यात प्रेक्षक कुठलीही कसर ठेवणार नाहीत, अशी अपेक्षा होती. फायनल मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर निळा समुद्र अवतरला होता. हे दृश्य पाहून ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनच्या मनातही धाकधूक वाढली होती. पण स्टेडियममध्ये इतके सारे प्रेक्षक असूनही ऑस्ट्रेलियाच काम सोपं झालं का?. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जे प्रेक्षक होते, त्यांच्यामुळे टीम इंडियाने सामना गमावला का?

हा प्रश्न आम्ही विचारलेला नाहीय. वर्ल्ड कप 2023 च्या पराभवानंतर सोशल मीडियावर ही चर्चा सुरु आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर साध्या सरळ स्वभावाच्या अहमदाबादच्या प्रेक्षकांवर निशाणा साधला जात आहे. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवाला अहमदाबादच्या प्रेक्षकांशी जोडलं जात आहे. त्याच एक कारण ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स सुद्धा आहे.

असं काय घडलं की….

तुम्हा विचार करत असाल, अहमदाबादच्या प्रेक्षकांनी अशी चूक काय केली?. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर असं काय घडलं की, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला? ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सचा आनंद गगनात मावत नव्हता. या सगळ्या प्रश्नांची उत्तर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या आवाजाशी संबंधित आहेत. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा जसा आवाज, गोंगाट दिसायला पाहिजे होता, तसा दिसला नाही अशीही सोशल मीडियावर चर्चा आहे.

त्यापेक्षा वेगळं चित्र

प्रेक्षकांचा आवाज नाही म्हणजे टीमला सपोर्ट नाही, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठ क्रिकेट मैदान आहे. सगळ स्टेडियम निळी जर्सी परिधान केलेल्या भारतीय फॅन्सनी भरलेलं होतं. असं म्हटलं जातय की, जेव्हा टीम इंडियाला सपोर्टची गरज होती. तेव्हा हे स्टेडियम शांत होतं. सन्नाटा होता. आवाज जसा असायला पाहिजे होता, त्यापेक्षा वेगळं चित्र होतं.

पॅट कमिन्सने काय मान्य केलं?

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स म्हणाला की, “मी जेव्हा स्टेडियममध्ये आलो, तेव्हा निळा सागर पाहून थोडा नव्हर्स होतो. 1 लाख 30 हजार भारतीयांना निळ्या जर्सीमध्ये पाहण हा क्षण कधीही विसरता येणार नाही. पण एक चांगली बाब म्हणजे त्यांनी गोंगाट केला नाही”

सोशल मीडियावर जी चर्चा आहे, त्यातून अहमदाबाच्या प्रेक्षकांना पराभवासाठी जबाबदार धरलं जातय. यापेक्षा फायनलचा सामना मुंबई, चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुला खेळवला असता, तर बर झालं असतं, असही म्हटलं जातय.

Non Stop LIVE Update
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका.
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?.
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?.
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?.
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.