AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मधून बाहेर झालेल्या भारतीय खेळाडूंवर कपिल देव यांचा गंभीर आरोप, BCCI ला हस्तक्षेप करण्याचे आवाहन

देश मोठा की आयपीएल? या प्रश्नाने भारतीय क्रिकेटमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

T20 World Cup मधून बाहेर झालेल्या भारतीय खेळाडूंवर कपिल देव यांचा गंभीर आरोप, BCCI ला हस्तक्षेप करण्याचे आवाहन
Kapil Dev
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 11:46 AM
Share

मुंबई : देश मोठा की आयपीएल? या प्रश्नाने भारतीय क्रिकेटमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला आहे. यासोबतच बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहनही देव यांनी केले आहे. सध्याचा टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. या स्पर्धेतील संघाचे पदार्पण इतके खराब झाले की उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडून त्याची किंमत भारताला चुकवावी लागली. (Kapil Dev Blames Players Prioritising IPL Over Country After Team India’s defeat in T20 World Cup)

कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, “जे घडले ते विसरून आपण आता पुढील टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, पुढील स्पर्धेच्या आयोजनाला जास्त वेळ नाही. भारताने आता तयारी करून पुढची योजना आखली पाहिजे.” देव म्हणाले की, आपल्या खेळाडूंना एक्स्पोजर मिळत आहे, पण ते त्याचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत.

काही खेळाडू आयपीएलला अधिक पसंती देत ​​आहेत : कपिल देव

दरम्यान, एक मोठे वक्तव्य देताना भारताचे माजी कर्णधार म्हणाले की, “संघातील काही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देत आहेत. बीसीसीआयने याकडे गांभीर्याने पाहावे. मात्र, खेळाडूंनी फ्रेचायझी क्रिकेट खेळू नये, असे मी म्हणत नाही, असेही कपिल देव म्हणाले. पण खेळाडूंनी स्वतःच त्यांचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे.

कपिल देव म्हणाले, “जेव्हा खेळाडू देशापेक्षा आयपीएलला अधिक प्राधान्य देऊ लागतात, तेव्हा आपण काहीही बोलू शकत नाही. आपल्या देशासाठी खेळताना खेळाडूला अभिमान वाटला पाहिजे. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहित नाही त्यामुळे मला जास्त काही सांगता येणार नाही. पण मी नक्कीच म्हणेन की, आधी देश असावा आणि नंतर फ्रेंचायझी असावी. फ्रेंचायझी क्रिकेट खेळू नका असे मी म्हणत नाही. पण क्रिकेटचे उत्तम नियोजन करण्याची जबाबदारी बीसीसीआयची असली पाहिजे. चालू स्पर्धेत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती न केल्यास आपल्याला मोठा धडा मिळेल. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या मोठ्या पराभवाचा फटका बसून स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

इतर बातम्या

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Kapil Dev Blames Players Prioritising IPL Over Country After Team India’s defeat in T20 World Cup)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.