AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI : राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? 2007चा फॉर्म्यूला बीसीसीआय वापरणार?

आशिया चषकात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता बीसीसाआयकडून एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे जुना फॉर्म्यूला आहे. हा फॉर्म्यूला नेमका काय आहे, ते जाणून घ्या...  

BCCI : राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? 2007चा फॉर्म्यूला बीसीसीआय वापरणार?
राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 11, 2022 | 4:59 PM
Share

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ड कपवर (T-20 world cup 2022) आता भारताची नजर आहे. आशिया चषकात भारतीय क्रिकेट टीमनं केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता बीसीसीआयनं काही निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. आशिया कप (Asia Cup 2022) मधील भारताचा प्रवास सुपर 4 मध्येच संपला. सुपर 4 मध्ये भारताला फक्त अफगाणिस्तानवर विजय मिळाला. यापूर्वी त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यादरम्यान, भारतीय संघात अनेक प्रयोग झाले, ते प्रयोग फ्लॉपही ठरले. आता टीम इंडियाच्या नजरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपवर आहे. त्यामुळे आता लवकरच टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी कोणाला मिळणार, कुणाला गाळलं जाणार, ही देखील सध्या चर्चा आहे. यातच आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ड कपसाठी भारत कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. बीसीसीआय ( BCCI) एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तो निर्णय नेमका काय आहे, तो एक जून फॉर्म्यूला तर नाही ना, ते जाणून घ्या…

युवा संघाची निवड?

आकाश चोप्रा एका प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभागी झाला होता. यावेळी चाहत्यांनी त्याला भारतीय क्रिकेटबद्दल प्रश्न विचारले. यावर त्यानंही सगळी आणि परिपूर्ण उत्तरं दिली. ही उत्तर आकाशनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर दिली. त्याच सत्रात आकाश चोप्राला एकानं विचारलं की टॉप 3 राहुल, कोहली आणि रोहित यांना वर्ल्डकपमधून वगळून युवा संघाची निवड करणे शक्य आहे का? यावर बोलताना आकाश म्हणाला की, ‘मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. तिन्ही खेळाडूंनी विश्वचषकात खेळावे. चांगले व्यासपीठ मिळाले पाहिजे. विश्वचषकात आमचा चांगला गट आहे. मोठा सामना. त्यामुळे तिघांनीही खेळावे. खरं तर 2007 मध्ये, बीसीसीआयने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एक नवीन आणि तरुण संघ टी-20 विश्वचषकासाठी पाठवला होता. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचा पराभव करून पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तिन्ही फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर केएल राहुल आणि रोहित शर्मा आशिया कपमध्ये खराब फॉर्ममध्ये नक्कीच झगडत होते. पण, विराट कोहली आशिया कपमध्ये फॉर्ममध्ये परतला. आशिया चषक स्पर्धेत त्याने 2 अर्धशतके आणि एक शतक झळकावले.

हा व्हिडीओ पाहा

बीसीसीआय तो निर्णय घेणार?

आशिया चषक स्पर्धेतील संघाची कामगिरी पाहिल्यानंतर काही चाहत्यांना वाटू लागलं की बीसीसीआयनं 2007 च्या जुन्या फॉर्म्यूलाचा वापर करून केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांना टी-20 विश्वचषकातून बाहेर काढावं आणि एक नवीन आणि युवा संघ करावा. 2007 च्या T20 विश्वचषकाप्रमाणे तो पाठवला गेला पाहिजं, असंही चाहते म्हणतायत.

आता यावर क्रिकेट चाहत्यांचे वेगवेगळे मतं आहेत. तर क्रिकेटर्स देखील आपलं मत मांडताना दिसतायत.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक