AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंतने पराभवाच्या दिलेल्या कारणांशी प्रशिक्षक असहमत, दिल्लीविरुद्ध खेळताना कुठे चुकलं? ते सांगितलं

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील हातात असलेला पहिलाच सामना गमावला. या पराभवाची जो तो त्याच्या पद्धतीने मांडणी करत आहे. सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपलं म्हणणं मांडलं. पण त्याचं विश्लेषण प्रशिक्षकांना काही रुचलं नाही. त्यांनी पराभवाची कारण अगदी त्याच्या उलट सांगितली.

ऋषभ पंतने पराभवाच्या दिलेल्या कारणांशी प्रशिक्षक असहमत, दिल्लीविरुद्ध खेळताना कुठे चुकलं? ते सांगितलं
ऋषभ पंतImage Credit source: LSG Twitter
| Updated on: Mar 25, 2025 | 4:39 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर संपूर्ण सामन्यावर लखनौ सुपर जायंट्सची पकड होती. पण या सामन्यातील काही चुका भोवल्या आणि पराभव झाला. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 9 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. या पराभवानंतर ऋषभ पंतने काय चुकलं ते सांगितलं. पण अगदी याच्या उलट सहायक प्रशिक्षक लांस क्लूजनरने वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात पहिल्या सामन्यापासूनच विचित्र वातावरण तयार झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने सामन्यानंतर सांगितलं की, ‘आम्ही चांगली धावसंख्या केली होती. पण या पराभवातून बरंच काही शिकलो आहोत आणि चुकांची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू. या पराभवासाठी त्यांनी ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा यांना सामन्याचं चित्र बदललं. तर त्याने विप्रज निगमची साथ मिळाली आणि सामना त्याच्या पारड्यात झुकला.’

सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक लांस क्लूजनर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पराभवाची कारणमीमांसा केली. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर हे ऋषभ पंतच्या अगदी उलट होतं. ‘टीम योग्य धावसंख्या उभारू शकली नाही. जर मला काही चूक दिसली तर मी सांगेन की आम्ही 20 ते 30 धावा कमी केल्या. त्यामुळे आम्ही गोलंदाजी करताना दबावात आलो. मला वाटतं की दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण आमच्यावर ही स्थिती ओढावण्याचं कारण म्हणजे आम्ही योग्य धावसंख्या उभारू शकलो नाहीत. खरं तर या धावा व्हायला हव्या होत्या. मला वाटतं की गोलंदाजांनी योग्य गोलंदाजी केली. थोडा स्पिन झाला. यासाठी मला वाटते की खूप चांगली विकेट होती. सर्वांसाठी काही ना काही होतं.’

‘मला वाटते की गोलंदाजी करणं कदाचित फलंदाजीच्या तुलनेत कठीण होतं. मी यासाठी हे सांगत आहे की आमच्याकडे अनुभव आणि फलंदाजीची क्षमता आहे. त्यामुळे आम्ही एवढ्या धावा करू शकलो. पुढचे दोन सामने आम्ही दुपारी खेळणार आहोत. त्यामुळे युवा खेळाडूंनी सकारात्मक राहावं. आम्हाला त्यांची क्षमता दाखवून द्यायची आहे.’, असं लांस क्लूजरने सांगितलं.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय