AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, दोन्ही गटात विजेतेपद, राज्याला सहाव्यांदा दुहेरी मुकुट

31 व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी (सब ज्युनियर) अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने इतिहास रचला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या उना येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेली स्पर्धा महाराष्ट्राने सहज जिंकली.

राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, दोन्ही गटात विजेतेपद, राज्याला सहाव्यांदा दुहेरी मुकुट
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 1:14 PM
Share

धर्मशाळा : 31 व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी (सब ज्युनियर) अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने इतिहास रचला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या उना येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेली स्पर्धा महाराष्ट्राने सहज जिंकली. बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर आणि किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या किशोर गटाने आतापर्यंत ही स्पर्धा 10 वेळा जिंकली आहेत, तर किशोरी गटाने 15 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. विशेष म्हणजे किशोर गटाने सलग सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. (Maharashtra Emerges Champions In Junior National Kho Kho Championship)

गेल्या वर्षी ही स्पर्धा झारखंड येथे खेळवण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्राच्या किशोर गटाने विजेतेपद मिळवलं होतं, तर किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. महाराष्ट्राने यंदा मात्र दुहेरी मुकुट पटकवला आहे. अशी कामगिरी माहाराष्ट्राने आतापर्यंत 6 वेळा केली आहे. दरम्यान, या स्पर्धेतील ‘भरत’ पुरस्कार महाराष्ट्राच्या आशीष गौतमला प्रदान करण्यात आला तर सानिका चाफेला ‘ईला’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

यंदा किशोर गटात कर्नाटकला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर पश्चिम बंगाल आणि हरयाणाचे संघ तिसऱ्या क्रमाकावर राहिले. तर किशोरी गटात पंजाबचा संघ उपविजेता ठरला. राजस्थान आणि दिल्लीने तिसरा क्रमांक पटकावला.

‘हिमाचल ही खेळभूमी म्हणून ओळखली जाईल’

किशोर गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राला 10 तर कर्नाटक संघाला 6 गुण मिळाले. किशोरींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला 11 तर पंजाबला 3 गुण मिळाले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कंवर म्हणाले की, “हिमाचल ही वीर भूमी आणि देवभूमी म्हणून ओळखली जातेच, तसेच ही आता खेळ भूमी म्हणून ओळखली जाईल. आपलं राज्य क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मदतीने राज्य सरकार क्रीडा आणि खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.”

खेलो इंडिया कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम

कंवर म्हणाले की, “उना जिल्ह्याने पद्मश्री चरणजीत सिंग, दीपक ठाकूर आणि निषाद कुमार असे अनेक खेळाडू देशाला दिले आहेत ज्यांनी अनेक पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवला आहे. केंद्र सरकारने खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत या क्षेत्रात बरेच काम केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.”

दरम्यान, यावेळी गोसेवा आयोगाचे उपाध्यक्ष अशोक शर्मा, जिल्हा भाजप अध्यक्ष मनोहर लाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्ण पाल शर्मा, राज्य खो-खो संघाचे अध्यक्ष राकेश ठाकूर, खो-खो फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष राकेश ठाकूर यांच्यासह विविध खो-खो संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरचिटणीस एम. एस. त्यागी व इतर खो-खो युनियन उपस्थित होते.

इतर बातम्या

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल

IPL 2022 : विराट कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार आरसीबी टीमचा नवा कॅप्टन

(Maharashtra Emerges Champions In Junior National Kho Kho Championship)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.