AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

धोनी निवृत्त होणार असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या पाश्वभूमीवर अखेरचा सामना कधी आणि कुठे असावा याबद्दल धोनीने सांगितलं आहे. चेन्नईमध्ये बोलत असताना अखेरचा सामना चेन्नई शहरातच खेळला जावा अशी माझी इच्छा आहे, असं धोनीने म्हटलंय.

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला...
ms dhoni
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:18 PM
Share

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे. धोनी क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या पाश्वभूमीवर अखेरचा सामना कधी आणि कुठे असावा याबद्दल खुद्द माहीने सांगितलं आहे. चेन्नईमध्ये बोलत असताना अखेरचा सामना चेन्नई शहरातच खेळण्याची इच्छा आहे, असं धोनीने म्हटलंय. तसेच क्रिकेटला अलविदा कधी करणार याबाबतदेखील त्याने अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय.

शेवटचा सामना चेन्नई येथे खेळण्याची इच्छा

“मी क्रिकेटचे सर्व सामने नियोजन लावूनच खेळले. मी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना रांची येथे खेळला. तर माझा अखेरचा टी-20 साना चेन्नई येथे व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा अखेरचा सामना पुढच्या वर्षी असेल किंवा पुढच्या पाच वर्षात कधीही असेल, या संदर्भात मला माहिती. पण तो चेन्नई येथेच खेळला जाईल अशी मला आशा आहे,” असे धोनी म्हणाला.

निवृत्तीबद्दल धोनीने काय सांगितले ?

याआधी धोनीने चेन्नईमध्येच आपल्या निवृ्त्तीबद्दल सविस्तर सांगितले. आता नोव्हेंबर महिना आहे आणि आयपीएल 2022 एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मी विचार करेल. सध्या घाई नाही, असे धोनीने माध्यमांना सांगितलं. क्रिकेटमधून सन्यास नेमका कधी घेणार हे थेट सांगणे धोनीने टाळले आहे.

आंततराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेला असला तरी धोनी आयपील t-20 सामन्यांत खेळतो. चेन्नई सुपर किंग्स या संघाचा तो कर्णधार आहे. आयपीएल 2021 ची ट्रॉफी चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात जिंकली. या घवघवीत यशानंतर धोनी आयपीएल 2022 सिझन खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आयपीएल 2022 मध्ये दहा टीम

दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये बरेच बदल होणार आहेत. या सिझनमध्ये प्रथमच 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आयपीएल 2022 पासून अहमदाबाद आणि लखनौ असे दोन नवे संघ खेळताना दिसतील.

इतर बातम्या :

एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीचं भावूक ट्विट, ABD चा प्रेमळ रिप्लाय

निवृत्तीच्या वेळी एबी डिव्हिलियर्सला भारताची आठवण, ABD चा भावनिक संदेश वाचून भारतीयांना अभिमान वाटेल

रोहितने 11 चेंडूत 5 विकेट घेणारा गोलंदाज मैदानात उतरवला, डेब्यू सामन्यात 2 बळी घेत विश्वास सार्थ ठरवला

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली