AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH: मुंबईला आज फक्त धुंवाधार बॅटिंगची गरज, 171 च्या फरकाने हैदराबादला हरवलं तरच नशीब पालटणार, हे 4 फलंदाज महत्त्वाचे!

आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध मुंबईला सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकावी लागेल. आणि ती जिंकल्यानंतर फक्त एकच निर्णय, प्रथम फलंदाजीचा.

MI vs SRH: मुंबईला आज फक्त धुंवाधार बॅटिंगची गरज, 171 च्या फरकाने हैदराबादला हरवलं तरच नशीब पालटणार, हे 4 फलंदाज महत्त्वाचे!
सनरायझर्स हैद्राबादला मुंबईला 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागणार आहे. (प्रातिनिधीक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आजचा मोठा दिवस आहे. कारण, आजचा सामन्यात त्यांना जिंकावंच लागेल. सामना सोडा, नाणेफेक हारणंही महागात पडू शकतं. जर आज नाणेफेक हरली तर ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा भंग जवळजवळ पावेल. आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध मुंबईला सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकावी लागेल. आणि ती जिंकल्यानंतर फक्त एकच निर्णय, प्रथम फलंदाजीचा. खेळपट्टीचा मूड कसा आहे, हवामान कसे आहे, या सर्व प्रश्नांना मागे टाकत आज त्यांना प्रथम फलंदाजीच निवडायची आणि जास्तीत जास्त धावा करायच्या. धावांचं शिखर कसं बनवता येईल हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे, सनरायझर्स हैद्राबादला मुंबईला 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागणार आहे. त्यामुळं आता किती धावा बनवाव्या लागतील हा विचार तुम्हीच करा. ( MI vs SRH: Mumbai Indians would be looking to score big and quickly against )

171 धावांचा फरक ठेऊन विजय मिळवला तरच मुंबई इंडियन्सचं नशीब चमकवेल. आणि त्याची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. म्हणूनच आज मुंबई इंडियन्सला त्यांच्या फलंदाजांची जास्त गरज आहे. रोहित शर्माला त्याच्या हिटमॅनचं रुप घ्यावं लागणार आहे. हेच नाही तर मागच्या सामन्यापासून फॉर्ममध्ये आलेल्या इशान किशनलाही नेक्स्ट लेव्हल गाठावी लागेल. आज सूर्यकुमारला हे लक्षात ठेवावे लागेल की जर तो चालला नाही, तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सूर्य अस्ताकडे जाईल. हार्दिक पांड्यालाही बॅटने तुफानी फलंदाजी करावी लागेल.

4 फलंदाजांच्या तुफानी बॅटिंगची गरज

मुंबई इंडियन्सच्या फक्त 4 फलंदाजांची नावं आम्ही घेत आहोत, कारण, हे चारच फलंदाज असेल आहे, जे आयपीएलमधून बाहेर फेकल्या जाण्याच्या वादळातून मुंबई नाव किनाऱ्यावर पोहचवू शकतात. पण, इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की, या चारही खेळाडूंचं सनरायजर्स हैद्राबादविरुद्धचं प्रदर्शन खूप काही चांगलं राहिलेलं नाही. त्यांचा स्ट्राईक रेट हैद्राबादविरुद्ध इतकाही चांगला नाही. मात्र, आज जर हे 4 खेळाडू चालले, तर मुंबई हारलेल्या खेळात पुन्हा एकदा एन्ट्री घेऊ शकते.

रोहित, इशान, सूर्यकुमार आणि पंड्या महत्त्वाचे

सगळ्यात आधी मुंबई इंडियन्सचा हिटमॅन आणि कर्णधार रोहित शर्मबद्दल बोलुया. आयपीएल 2018 पासून सलग ऑरेंज आर्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध रोहित शर्माचा 106 स्ट्राईक रेट आहे. इशान किशनने हैद्राबादविरुद्ध 100 पेक्षाही कमीच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राईक रेट 95 आहे. सूर्यकुमार यादव त्यातल्या त्यात वरचढ आहे, त्याचा हैदराबादविरुद्धचा स्ट्राईकरेट हा 112 आहे तर हार्दिक पांड्यानेही फक्त 105 च्या स्ट्राई रेटने धावा केल्या आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांत या सर्वांना जुने रेकॉर्ड विसरुन खेळावं लागले, काहीतरी हटके करावं लागेल, तरच मुंबईचं नशीब पालटू शकतं.

हेही वाचा:

IPL 2021: कोलकात्यासमोर राजस्थानच्या फलंदाजानी गुडघे टेकले, 86 धावांनी केकेआरचा मोठा विजय

IPL 2021: हर्षल पटेलने तोडला बुमराहचा दमदार रेकॉर्ड, आता नजर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरीवर

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.