T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!

भारताने टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात गोलंदाजाचा विचार करता तीन मुख्य वेगवान गोलंदाज तर पाच फिरकीपटू आहेत. पण विशेष म्हणजे यामध्ये कर्णधार विराटच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एकही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!
सिराज आणि चहल
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 12:22 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (8 सप्टेंबर) टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी 15 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या संघात असण्यावर जितकी चर्चा आहे तितकीच काही खेळाडूंना संधी न देण्यात आल्याने देखील आहे. यातीलच दोन खेळाडू हे तर कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) हुकुमी एक्के आहेत. विराटच्या आरसीबी संघातील मुख्य गोलंदाज असणाऱ्या या दोघांनाही टी-20 संघात स्थान मिळालेलं नाही. इतकं सांगितल्यानंतर तुम्हाला कळालचं असेल आम्ही कुणाबद्दल बोलतोय. होय हे दोन खेळाडू म्हणजे अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj).

टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात मुख्य 15 खेळाडूंमध्ये  5 फिरकीपटूंचा समावेश आहे. तर 3 प्रमुख गोलंदाज असून 6 प्रमुख फलंदाजांसह हार्दिक पंड्या चौथा वेगवान गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून खेळणार आहे. दरम्यान यामध्ये फिरकीपटूंच्या ताफ्यात अनुभवी चहलच्या जागी नवख्या राहुल चाहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली आहे. तर तीनच वेगवान गोलंदाज असणाऱ्यांमध्ये अनुभवी दिग्गजांमध्ये सिराज जागा मिळवू शकलेला नाही. आता यामागील कारणं अशी असू शकतात…

चहलचा विरुद्ध चहर

संघात युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला स्थान देण्यात आलं असून यामागे दोघांची अलीकडील आयपीएलमधील कामगिरी हे सर्वात मोठं कारण असू शकतं. आरसीबी संघातील मुख्य फिरकीपटू चहल हा विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरतो. पण सोबतच त्याला भरपूर धावा ठोकल्या जातात. त्यातच मुंबई इंडियन्सचा राहुल चहर हा एक मुंबईकडून महत्त्वाच्या क्षणी विकेट तर घेतोच आहे. सोबतच अत्यंत कमी धावा ओव्हरमध्ये देण्यासाठी त्याला ओळखलं जात. दरम्यान या निवडीवर अनेकजण आपलं मत देत असून प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले याने देखील चहलला न घेता राहुल चहरला संधी हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

तर आकाश चोप्राने चहल हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असूनही संघात पाच फिरकीपटूंना संधी देताना त्याला न घेण्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याने तसं ट्विटही केलं आहे.

दिग्गजांच्या गर्दीत सिराजला स्थान नाही

चहलनंतरचा एक धक्कादायक निर्णय म्हणजे युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालेलं नाही. यामागे कारण म्हणजे सामने होत असलेले दुबई, शारजाह आणि अबुधाबीची मैदानं फिरकीपटूंसाठी काही तुलनेत अधिक फायद्याची आहेत. त्यातच आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात या मैदानात वेगवान गोलंदाजाना खास फायदा झालेला नाही. त्यामुळे अधिक फिरकीपटू घेण्यात आले आहेत. त्यामुळे बुमराह, शमी आणि भुवनेश्वर हे तीनच वेगवान गोलंदाज घेतले असून हे तिघेही सिराजच्या तुलनेत अनुभवी आण दिग्गज असल्याने सिराजचा पत्ता कट झाला आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

(Mohammed siraj and yuzvendra chahal didnt took place in team india for t20 world cup everyone shocks with this decision)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.