AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK A vs IND A | पाकिस्तान ए ‘आशिया किंग’, टीम इंडियावर 128 धावांनी विजय

Pakistan A vs India A Final Asia Cup 2023 | पाकिस्तान ए क्रिकेट टीमने टीम इंडियावर 128 धावांनी दणदणीत विजय मिळवत आशिया कप जिंकला आहे.

PAK A vs IND A | पाकिस्तान ए 'आशिया किंग', टीम इंडियावर 128 धावांनी विजय
| Updated on: Jul 23, 2023 | 10:20 PM
Share

कोलंबो | पाकिस्तान ए क्रिकेट टीम एमर्जिंग आशिया चॅम्पियन ठरली आहे. पाकिस्तान ए ने टीम इंडिया एवर महाअंतिम सामन्यात 128 धावांनी विजय मिळवत आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 353 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाचा डाव 40 ओव्हरमध्ये 224 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतापदावर समाधान मानवं लागलं आहे. पाकिस्तानने या विजयासह 10 वर्षांपू्र्वीचा बदला घेतलाच. टीम इंडिया एने 2013 मध्ये सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान ए टीमवर विजय मिळवला होता.

पाकिस्तान ए चॅम्पियन

टीम इंडियाची हारकीरी

टीम इंडियाची 353 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात राहिली. साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. सुदर्शनने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर निकीन जोस याच्या रुपात टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. निकीनने 11 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद वसीम ज्यूनिअर याने निकीन याला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 80 अशी स्थिती झाली.

त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कॅप्टन यश धूल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अभिषेकने 51 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स ठोकत 61 रन्स केल्या. त्यानंतर निशांत सिंधू, यश धुल आणि ध्रुव जुरेल दोघेही ठराविक अंतराने बाद झाले. सिंधूने 10, धुलने 39 आणि ध्रुव याने 9 धावा जोडल्या.

टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे विजयाची आशा कमी झाली होती. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर उर्वरित फलंदाजांनीही आपल्या विकेट टाकल्या आणि पाकिस्तान आशिया चॅम्पियन ठरली. पाकिस्तानकडून सूफियान मुकीम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मेहरान मुमताज, अर्शद इक्बाल आणि मोहम्मद वसीम ज्यूनिअर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुबासिर खान याच्या खात्यात एकमेव विकेट गेली.

टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने शानदार सुरुवात केली. सॅम अयूब आणि साहिबजादा फरहान या दोघांनी 121 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला झटके देत जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने झटके देत पाकिस्तानची 5 बाद 187 अशी स्थिती केली.

त्यानंतर तय्यब ताहीर आणि आणि मुबासिर खान या दोघांनी 126 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे पाकिस्तानने 300 पार मजल मारली. शेवटी काही जणांनी जोरदार फटकेबाजी केली आणि पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 352 धावा केल्या. पाकिस्तानकडून तय्यब याने शतक ठोकलं. तय्यबने 71 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरच्या मदतीने 108 रन्स केल्या. तर साहिबजादा याने 59 रन्स केल्या. टीम इंडियाकडून राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू या तिघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगरगेकर आणि युवराजसिंह डोडिया.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.