U19 World Cup : भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्जवल हातात, पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंची पाठ थोपटली

भारतीय संघ आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यापैकी 5 वेळा भारतीय संघाने चषक उंचावला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

U19 World Cup : भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्जवल हातात, पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंची पाठ थोपटली
Indian U19 cricket team (फोटो- BCCI)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 10:25 AM

मुंबई : भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये (ICC under 19 world cup) वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा (Yash Dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवर भारतीय संघाचं नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. भारतीय संघ आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यापैकी 5 वेळा भारतीय संघाने चषक उंचावला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, युवा टीम इंडियाचं कौतुक करणाऱ्यांमध्ये आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भर पडली आहे. त्यांनीदेखील युवा भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

भारताने 19 वर्षांखालील विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर आयर्लंड, युगांडा, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांना पराभूत करत विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.

भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्वल हातात : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करून सर्व खेळाडूंचे विजयाबद्दल अभिनंदन केले. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आम्हाला आमच्या युवा खेळाडूंचा अभिमान आहे. अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आम्ही त्याचे अभिनंदन करतो. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी सर्वांची मनं जिंकली. त्यांची ही कामगिरी दाखवते की भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आणि उज्वल हातात आहे.”

सहवाग म्हणाला, ‘यहां जलवा है हमारा’

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच जगभरातील क्रिकेटपटूंनीही भारताच्या अंडर-19 संघाच्या यशाचे कौतुक केले आहे. यात पहिले नाव येते विरेंद्र सहवागचे, ज्याने एका वाक्यात संपूर्ण यशाचे वर्णन करताना म्हटलं आहे, ‘यहां जलवा है हमारा’

इयान बिशपने पाठ थोपटली

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू इयान बिशपनेही भारताच्या अंडर-19 संघाच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याच्या व्यतिरिक्त, क्रिकेटपटू उन्मुक्त चंद ज्याने भारताला 2012 मध्ये अंडर-19 चॅम्पियन बनवले, त्याने देखील सध्याच्या संघाला त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या

ICC U19 World Cup : संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा, प्रत्येक संघ 200 धावांच्या आत गुंडाळला

Raj Bawa : राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं

Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.