AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narednra Modi | ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयासाठी पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं कौतुक, खेळाडूंनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला.

PM Narednra Modi | ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयासाठी पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं कौतुक, खेळाडूंनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडिया
| Updated on: Jan 31, 2021 | 7:55 PM
Share

नवी दिल्ली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत (Border Gavaskar Tropy) ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआने (Bcci) टीम इंडियाला बक्षिस म्हणून 5 कोटींचा बोनस जाहीर केला. तर आनंद महिंद्रा यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना (mahindra suv thar) बक्षिस म्हणून भेट दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विट करत आणि मन की बात (Mann Ki Baat) या विशेष कार्यक्रमातील संवादादरम्यान टीम इंडियाचं कौतुक केलं. (PM Narendra Modi lauded Team India for their historic victory in the Test series against Australia)

मोदी काय म्हणाले?

“या महिन्यात क्रिकेटमधून गोड बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणीनंतर शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आमच्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क ही प्रेरणादायक आहे”,असं ट्विट करत मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

मोदींनी टीम इंडियासाठी केलेलं ट्विट

बीसीसीआयसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोदींचे आभार मानले. “तुम्ही केलेल्या प्रशंसेसाठी आणि प्रोत्साहनासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. तिरंगा नेहमीच असाच फडकत राहो, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करु”, असं आश्वासन बीसीसीआयने ट्विद्वारे मोदींना दिलं.

बीसीसीआयने केलेले ट्विट

“आपल्या आत्मविश्वास वाढविणार्‍या शब्दांबद्दल धन्यवाद. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट असते. आम्ही प्रत्येकाला अशा प्रकारे प्रेरित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू”, असं म्हणत अजिंक्य रहाणेने मोदींचं आभार मानले. अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला हा विजय मिळवून दिला.

मोदींना या मन की बातदरम्यान बऱ्याच विषयाावर संवाद साधला. यावेळेस त्यांनी कोरोना लसबद्दल भाष्य केलं. “मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. तसेच आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे, असंही ते म्हणाले. गेल्या 15 दिवसात देशात 30 लाख कोविड योद्ध्यांना लस टोचली आहे. अमेरिकेला याच कामासाठी 18 तर ब्रिटन सारख्या समृद्ध देशाला 36 दिवस लागले”, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Mann Ki Baat: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला; मोदींनी मौन सोडलं

(PM Narendra Modi lauded Team India for their historic victory in the Test series against Australia)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.