AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचं जेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट, म्हणाले…

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू काश्मीरने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा जेतेपद मिळवलं आहे. 67 वर्षानंतर त्याने हे यश मिळालं आहे. या यशस्वी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं कौतुक केलं आणि शुभेच्छाही दिल्या.

जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचं जेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट, म्हणाले...
जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचं जेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट, म्हणाले...Image Credit source: PM Modi Twitter
| Updated on: Feb 28, 2026 | 7:11 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरू झाल्यानंतर जम्मू काश्मीरचा संघ जेतेपद मिळवेल असा कोणी विचारही केला नव्हता. कारण आतापर्यंतचा या संघाचा रेकॉर्ड जेतेपदाचा नाही. पण या स्पर्धेत जम्मू काश्मीर संघाने साखळी फेरीपासून छाप पाडली. भल्याभल्या संघांना पराभवाची धूळ चारली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पहिल्यांदा धडक मारली. तसेच अंतिम फेरी गाठण्यातही यश मिळवलं. जम्मू काश्मीरचा चढता आलेख पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसत होता. अंतिम फेरीत काय होते याची उत्सुकता होती. पण अंतिम फेरीतही जम्मू काश्मीरचं नाणं खणखणीत वाजलं. तसेच पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची किमया साधली. जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीत 67 वर्षानंतर जेतेपद मिळवलं. या विजयासह जम्मू काश्मीरच्या नावावर एक विक्रम रचला गेला आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून जम्मू काश्मीर संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर संघाचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीर संघाचं त्यांच्या पहिल्या रणजी करंडक विजयाबद्दल अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय संघाच्या उल्लेखनीय धैर्य, शिस्त आणि उत्साहाचे प्रतिबिंब आहे. हा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि तो तेथील वाढत्या क्रीडा उत्साह आणि प्रतिभेला अधोरेखित करतो. या कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक खेळण्याची प्रेरणा मिळेल.’

जम्मू काश्मीरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्य होता. कारण पहिल्या डावात जम्मू काश्मीर संघाने 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ 293 धावा करून शकला. त्यामुळे पहिल्या डावात 291 धावांची आघाडी मिळाली आणि जम्मू काश्मीरचा विजय पक्का झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरने 4 गडी गमवून 342 धावांपर्यंत मजल मारली. तसेच पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रानंतरही खेळत होते. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधाराच्या संमतीनंतर हा सामना ड्रॉ केला गेला. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीमुळे जम्मू काश्मीरचा विजय झाला.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.