AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या

Ranji Trophy Final 2025-26 : रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. कारण जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या
Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्याImage Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Feb 24, 2026 | 5:35 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना हुबळी येथील केएससीए मैदानावर होत आहे. या सामन्यात कर्नाटक आणि जम्मू आणि काश्मीर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार पारस डोगरा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी 87 षटकांचा खेळ झाला आणि जम्मू काश्मीरने 2 गडी गमवून 284 धावा केल्या आहे. जम्मू काश्मीरची पहिली विकेट संघाच्या 18 धावा असताना पडली. कामरान इकबाल 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी केली. 244 चेंडूपैकी 120 चेंडूंचा सामना करत शुभम पुंडीरने 58 धावा आणि यावर हसनने 124 चेंडूंचा सामना 78 धावा केल्या. यावर हसने 88 धावांवर असताना बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तर कर्णधार पारस डोगरा फलंदाजीला आला आणि दुखापत झाल्याने 9 धावांवरच रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शुभम पुंडीर आणि अब्दुल समद यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये नाबाद 105 धावांची भागीदारी झाली आहे. तर शुभम पुंडीर नाबाद 117 आणि अब्दुल समद नाबाद 52 धावांवर खेळत आहे.

जम्मू काश्मीरने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला आहे. त्यामुळे त्यांचा मानस दुसऱ्या दिवशी 500 पार धावा करण्याचा असेल यात काही शंका नाही. कारण जेतेपद मिळवायचं असेल. पहिल्या डावातील रणनिती खूपच महत्त्वाची असते. अन्यथा सामना ड्रॉच्या स्थितीत पोहोचला तर जेतेपद हातून जाऊ शकतं. तुम्हालाही हा सामना बरोबरीत सुटला तर विजेता कोण असेल असा प्रश्न पडला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.

  1. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.
  2. जम्मू आणि काश्मीर संघाने पहिल्या डावात 500 धावा केल्या आणि कर्नाटकने पहिल्या डावात 499 धावा केल्या. पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात 1 धावांची आघाडी असलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाला विजेता घोषित केले जाईल.
  3. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 500 धावा केल्या आणि कर्नाटकने पहिल्या डावात 501 धावा केल्या असतील. तसेच पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात 1 धावांची आघाडी असलेले कर्नाटक संघाला विजेतेपद मिळवेल.

रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याचे नियम:

  • पहिल्या डावातील आघाडी: जर पाच दिवसांच्या खेळानंतर सामना अनिर्णित राहिला. तर पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.
  • पहिल्या डावातील धावसंख्या बरोबरीत सुटली तर हा पेच नेट रनरेटच्या आधारावर सोडवला जातो. लीग टप्प्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघाला विजेता मानले जाते.
  • रणजी ट्रॉफी स्पर्धेत गेल्या वर्षी (2024-25) विदर्भ संघ केरळविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे चॅम्पियन ठरला होता.

Follow Us
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?