AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या

Ranji Trophy Final 2025-26 : रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. कारण जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या
Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्याImage Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Feb 24, 2026 | 5:35 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना हुबळी येथील केएससीए मैदानावर होत आहे. या सामन्यात कर्नाटक आणि जम्मू आणि काश्मीर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार पारस डोगरा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी 87 षटकांचा खेळ झाला आणि जम्मू काश्मीरने 2 गडी गमवून 284 धावा केल्या आहे. जम्मू काश्मीरची पहिली विकेट संघाच्या 18 धावा असताना पडली. कामरान इकबाल 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी केली. 244 चेंडूपैकी 120 चेंडूंचा सामना करत शुभम पुंडीरने 58 धावा आणि यावर हसनने 124 चेंडूंचा सामना 78 धावा केल्या. यावर हसने 88 धावांवर असताना बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तर कर्णधार पारस डोगरा फलंदाजीला आला आणि दुखापत झाल्याने 9 धावांवरच रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शुभम पुंडीर आणि अब्दुल समद यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये नाबाद 105 धावांची भागीदारी झाली आहे. तर शुभम पुंडीर नाबाद 117 आणि अब्दुल समद नाबाद 52 धावांवर खेळत आहे.

जम्मू काश्मीरने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला आहे. त्यामुळे त्यांचा मानस दुसऱ्या दिवशी 500 पार धावा करण्याचा असेल यात काही शंका नाही. कारण जेतेपद मिळवायचं असेल. पहिल्या डावातील रणनिती खूपच महत्त्वाची असते. अन्यथा सामना ड्रॉच्या स्थितीत पोहोचला तर जेतेपद हातून जाऊ शकतं. तुम्हालाही हा सामना बरोबरीत सुटला तर विजेता कोण असेल असा प्रश्न पडला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.

  1. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.
  2. जम्मू आणि काश्मीर संघाने पहिल्या डावात 500 धावा केल्या आणि कर्नाटकने पहिल्या डावात 499 धावा केल्या. पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात 1 धावांची आघाडी असलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाला विजेता घोषित केले जाईल.
  3. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 500 धावा केल्या आणि कर्नाटकने पहिल्या डावात 501 धावा केल्या असतील. तसेच पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात 1 धावांची आघाडी असलेले कर्नाटक संघाला विजेतेपद मिळवेल.

रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याचे नियम:

  • पहिल्या डावातील आघाडी: जर पाच दिवसांच्या खेळानंतर सामना अनिर्णित राहिला. तर पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते.
  • पहिल्या डावातील धावसंख्या बरोबरीत सुटली तर हा पेच नेट रनरेटच्या आधारावर सोडवला जातो. लीग टप्प्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघाला विजेता मानले जाते.
  • रणजी ट्रॉफी स्पर्धेत गेल्या वर्षी (2024-25) विदर्भ संघ केरळविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे चॅम्पियन ठरला होता.

Follow Us
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.