AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर

अफगाणिस्तानिविरूद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे दोघंही नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. असं असताना निवड समिती अध्यक्ष अजीत आगरकर यांनी कारण सांगितलं आहे.

India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर
India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोरImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 7:40 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयने पुढची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात अष्टपैलू आणि फिरकीची धुरा असणारे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचं नाव नाही. या दोघांना संघाबाहेर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण मधल्या फळीत हे दोन्ही खेळाडू हुकूमाचे एक्के ठरतात. या दोघांनी आतापर्यंत अनेक सामने जिंकवले आहेत. वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करता या दोघांना या संघात असायला हवं होतं. पण या दोघांना संघातून वगळण्याचं कारण मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं आहे. अजित आगरकर यांनी सांगितलं की, वनडे वर्ल्डकप अजून खूप लांब आहे. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या पर्यायांची चाचपणी करत आहे.

अजित आगरकर म्हणाले की…

अजित आगरकर यांनी टीम इंडियाच्या निवडीनंतर पत्रकार परिषदेला समोरं गेला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘वनडे क्रिकेटचं बोलायचं तर अजून वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15-16 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आम्ही अजून काही पर्यायांची चाचपणी करत आहोत. खासकरून दक्षिण अफ्रिकेतील स्थिती आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छित आहोत. आम्हाला माहिती आहे की, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा काय करू शकतात. पण ही वेळ दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्याची आहे.’ दुसरीकडे, टीम इंडियात मोहम्मद शमीला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण त्यालाही डावलण्यात आलं. अजीत आगरकरने त्याचंही कारण सांगितलं.

अजित आगरकरने मोहम्मद शमीला न निवडण्याचं कारण सांगताना स्पष्ट केलं की, ‘आम्हाला सांगितलं गेलं की मोहम्मद शमी टी20 क्रिकेटसाठी तयार आहे. यासाठी त्याच्या नावाची चर्चा झाली नाही.’ दरम्यान, वनडे संघातून यशस्वी जयस्वाललाही डावलण्यात आलं. जयस्वालने दक्षिण अफ्रिकेत वनडे मालिका खेळली होती. त्यात शतकी खेळी केली होती. पण त्यालाही संघात निवडलं नाही.

भारताचा वनडे संघ: शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड़ आणि हर्ष दुबे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल