AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या

BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भविष्याचा वेध घेत एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या दरम्यान विदेशी क्रिकेट लीग स्पर्धांकडे खेळाडूंचा ओढा पाहता त्यांना रोखण्यासाठी विचारविनिमय झाला.

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या
टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या
| Updated on: Jun 05, 2026 | 4:34 PM
Share

BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या भविष्यासाठी पॉलिसी तयार करण्याची योजना आखत आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यानंतर विदेशी टी20 लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू एक रणनितीचा अवलंब करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा करत आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यावर गंभीररित्या चर्चा झाली. बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणताही सक्रिय भारतीय क्रिकेटपटून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा आयपीएल स्पर्धेचा भाग असेल तर त्याला विदेशी टी20 किंवा फ्रेंचायझी लीग खेळण्याची परवानगी नाही. पण भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यास त्यांना विदेशी लीग स्पर्धेत खेळण्याची सधी मिळते.

बीसीसीआयच्या या नियमातील पळवाट शोधून अनेक खेळाडू निवृत्ती घेत विदेशी संघांसोबत करार करत आहेत. रिपोर्टनुसार, खेळाडूंनी विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी शोधलेली पळवाट रोखण्यासाठी बीसीसीआय बैठकीत एक कूलिंग ऑफ पीरियड आणण्याचा विचार सुरू झाला आहे. चर्चेनुसार, एखादा भारतीय खेळाडू निवृत्तीनंतर थेट विदेशी लीग खेळायला जात असेल तर त्याला भारतीय क्रिकेट सिस्टममध्ये परतण्यासाठी कमीत कमी 5 वर्षांची बंदी घातली जाईल. म्हणजेच पाच वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता पळवाट शोधून विदेशी लीग खेळणं खेळाडूंना अडचणीचं ठरू शकते.

बीसीसीआयच्या मते, देशातील अनुभवी खेळाडूंनी जास्तीत जास्त वेळ भारतीय क्रिकेटला आणि आयपीएलची प्रतिष्ठा जपण्यासाठी द्यावा. पण आता बीसीसीआय हा नियम कधी लागू करणार आणि कसा लागू होणार यावर क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. काही खेळाडूंना देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये हवी तशी संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसतो, अशा स्थितीत खेळाडूंना कशी संधी देणार हे देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान, बीसीसीआय बैठकीनंतर या चर्चेवर अखेरचा शिक्कामोर्तब आणि कायदेशीर पैलूंचा विचार करण्याची जबाबदारी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांकडे सोपवण्यात आली आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...