AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant : इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं, प्रशिक्षक राहुल द्रविडचीही बरोबरी केली, ऋषभ पंतची सामन्यातील कामगिरी जाणून घ्या…

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्यानं ऋषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या तोंडातून काढून घेतला. हार्दिक 71 धावा करून बाद झाला. ऋषभची चांगली चर्चा होती.

Rishabh Pant : इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं, प्रशिक्षक राहुल द्रविडचीही बरोबरी केली, ऋषभ पंतची सामन्यातील कामगिरी जाणून घ्या...
ऋषभ पंतImage Credit source: social
| Updated on: Jul 18, 2022 | 8:14 AM
Share

IND vs ENG 3rd ODI  : रविवारी रात्री मँचेस्टरचा 39 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत भारतानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. हा निर्णायक सामना जिंकल्यानंतर टीम इंडियानं एकदिवसीय मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताच्या विजयाचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant), त्याने 113 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतनं नाबाद 125 धावांची खेळी केली. पंतनं आपल्या शतकाच्या जोरावर प्रशिक्षक राहुल द्रविडशी बरोबरी साधली आणि आशियाबाहेर 100 धावांचा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला. होय, यापूर्वी हा पराक्रम फक्त राहुल द्रविड आणि केएल राहुलनं केला होता. भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून शतक करणारा आशियाबाहेरचा पहिला खेळाडू होता. 1999 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची शानदार इनिंग खेळली होती. यानंतर 2020 मध्ये केएल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या आणि या यादीत आपलं नाव नोंदवलं.आता 125 धावांची धडाकेबाज खेळी खेळून आशियाबाहेर शतक ठोकणारा पंत तिसरा भारतीय ठरलाय.

स्पर्धेबद्दल बोलताना रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी यजमानांना 259 धावांत गुंडाळून आपलं काम केलं होतं. पण, लॉर्ड्सप्रमाणेच मँचेस्टरमध्येही पुन्हा एकदा भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली. शिखर धवन 1 नंतर रोहित-कोहली 17-17 धावा करून बाद झाले, तर सूर्यकुमार यादवलाही 16 धावा करता आल्या.भारतानं 72 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या, त्यावेळी पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅटिंग डेप्थचे नुकसान सहन करावे लागेल असे वाटत होते, परंतु पंत आणि हार्दिकने हे होऊ दिले नाही.

हायलाईट्स

  1. 1999 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची शानदार इनिंग खेळली
  2. 2020 मध्ये केएल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या
  3. आता 125 धावांची धडाकेबाज खेळी खेळून आशियाबाहेर शतक ठोकणारा पंत तिसरा भारतीय ठरलाय.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्यानं ऋषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या तोंडातून काढून घेतला. हार्दिक 71 धावा करून बाद झाला, पण दुसऱ्या टोकाला असलेला पंत शतक ठोकण्याच्या मूडमध्ये होता. पंतनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक 106 चेंडूत झळकावले.

त्यानंतर भारतीय यष्टीरक्षकाने अधिक आक्रमक फॉर्म दाखवला. डेव्हिड विलीच्या एका षटकात त्यानं 5 चौकार मारले, तर त्याने 43 वे षटक आणले, तर त्याने रूटच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करून सामना आपल्या शैलीत संपवला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.