AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही; निवड समितीच्या माजी सदस्याचं मोठं विधान

विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर वनडे फॉरमॅटमध्येही नेतृत्व बदलाची कुजबुज सुरू आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाची कमान कोणाकडे जाणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून उपकर्णधार रोहित शर्माचे नाव साहजिकच पुढे आहे.

रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही; निवड समितीच्या माजी सदस्याचं मोठं विधान
Rohit Sharma
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 03, 2021 | 5:39 PM
Share

दुबई : 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघात नेतृत्व बदल आधीच ठरले होते. कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिना अगोदर T20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आता विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर वनडे फॉरमॅटमध्येही नेतृत्व बदलाची कुजबुज सुरू आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाची कमान कोणाकडे जाणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून उपकर्णधार रोहित शर्माचे नाव साहजिकच पुढे आहे, मात्र भविष्यातील तयारी पाहता काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांचाही असा विश्वास आहे की, रोहित ही पहिली पसंती असू शकतो परंतु तो दीर्घकालीन योजनेचा भाग होऊ शकत नाही, किंवा तो कर्णधार म्हणून दीर्घकालीन पर्याय असू शकत नाही. (Rohit Sharma can’t be long-term captaincy option, says Sarandeep Singh)

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला लगेचच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे आणि पहिल्यांदाच संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआयचे निवडकर्ते या मालिकेसाठी संघ निवडीसोबतच कर्णधाराबाबतही निर्णय घेतील. रोहित शर्मा नियमित कर्णधार बनणार आहे. रोहित या मालिकेचा भाग असेल की नाही हे स्पष्ट झाले नसले तरी पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी तो कर्णधार असेल हे जवळपास निश्चित आहे.

रोहितला पहिली पसंती, मात्र दीर्घकालीन पर्याय नाही

33 वर्षीय रोहित शर्माचे वय आणि पुढील काही वर्षांत संघात होणारे बदल लक्षात घेऊन भविष्यातील तयारीनुसार कर्णधार बनवावा, अशीही मागणी होत आहे. किंवा त्यानुसार नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये युवा खेळाडूंचा समावेश करावा. या संदर्भात माजी फिरकीपटू आणि निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

“रोहित हा चांगला पर्याय आहे. तो तुमच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण निवड समितीने त्याला काही वर्षांसाठी (2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत) कर्णधार बनवायचे की दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूवर जबाबदारी सोपवायची हे ठरवायचे आहे. जर ते खूप पुढचा विचार करत असतील तर केएल राहुल आणि ऋषभ पंत हे चांगले पर्याय असू शकतात.

इतर बातम्या

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला

(Rohit Sharma can’t be long-term captaincy option, says Sarandeep Singh)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.