AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माने कर्णधारपद भुषवू नये! सुनील गावस्कर असं का म्हणाले?

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 3-0 ने पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारताचं सर्वच गणित फिस्कटलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं आता कठीण झालं आहे. भारताला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4 सामने काहीही करून जिंकणं भाग आहे. असं असताना रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून वादाची ठिणगी पेटली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माने कर्णधारपद भुषवू नये! सुनील गावस्कर असं का म्हणाले?
| Updated on: Nov 05, 2024 | 3:28 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांच्या संघांची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मात्र कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 ने पराभवाचं तोंड पाहायला लागल्यानंतर पत्रकारांना याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं की, मलाही माहिती नाही. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकू शकतो. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह संघाचं कर्णधारपद भुषवू शकतो. असं असताना आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. रोहित शर्मा एकापेक्षा अधिक सामन्यात खेळणार नसेल तर त्याने पूर्ण मालिकेत कर्णधारपद भुषवू नये. त्याने एक खेळाडू म्हणून दौरा करावा. सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कर्णधाराने पहिला सामना खेळणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट तकशी बोलताना सांगितलं की, ‘बघा, कर्णधाराला पहिला सामना खेळणं महत्त्वाचं असतं. जर तो जखमी असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण पहिल्याच सामन्यात लीडर अनुपस्थिती असेल तर उपकर्णधारावर दबाव वाढतो. ते प्रेशर वेगळ असतं. त्यानंतर कर्णधारपदाची पुन्हा जबाबदारी स्वीकारणं कठीण होऊन बसतं.’

‘मला पण माहिती नाही, पण जे काही कळतं ते वाचून कळतं. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. कदाचित दुसऱ्या सामन्यातही खेळणार नाही. जर असं असेल तर निवड समितीने याबाबत आताच स्पष्ट काय ते बोललं पाहीजे. अजित आगरकरने सांगितलं पाहीजे की, जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. जो काही तुझं वैयक्तिक कारण असेल.’, असंही सुनील गावस्कर म्हणाले.

‘पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 ते 3 सामने खेळत नाही. तर दौऱ्यावर एक खेळाडू म्हणून जा. दुसऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये जेव्हा पाहीजे तेव्हा जा. या दौऱ्यासाठी कर्णधार बदलून उपकर्णधाराकडे जबाबदारी सोपणार असाल तर त्यात स्पष्टता असावी. कर्णधाराची एक जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही 3-0 ने हरता तेव्हा नेतृत्व आवश्यक आहे. नक्कीच आवश्यक आहे.’ , असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Follow Us
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.