AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : तू प्लेइंग इलेवनबाहेर का नाही गेला, रोहितला विचारण्यात आलं, रोहित काय म्हणाला…

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत सतत चर्चा होत असते. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मलिकेत दोन खेळाडूंना विश्रांती मिळू शकते.

Rohit Sharma : तू प्लेइंग इलेवनबाहेर का नाही गेला, रोहितला विचारण्यात आलं, रोहित काय म्हणाला...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माImage Credit source: aaj tak
| Updated on: May 18, 2022 | 3:00 PM
Share

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (SRH) सामना झाला. हैदराबादचा संघ पहिले फलंदाजी करत होता. या सामन्याचा प्रभाव प्लेऑफवर पडणार, हे सर्वाना माहित होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठं विधान केलंय. यावेळी क्रिकेटचं समसालोचन करणाऱ्यानं त्याल विचारलं की, तू स्वत: प्लेइंग इलेवनमधून बाहेर का नाही गेला, त्यावर रोहित शर्माने एक मोठं विधान केलंय. नाणेफेकीच्या वेळी इयान बिशपने विचारलं की मुंबई इंडियन्स आता प्लेऑफमध्ये जाऊ शकत नाहीत. मग कामाचा ताण लक्षात घेऊन तुम्ही स्वत:आणि जसप्रीत बुमराह प्लेऑफच्या मधून बाहेर का जात नाहीत, असं समालोचकानं म्हटलं. यावर रोहित शर्मा म्हणाला की, ‘संघाची मुख्य फळी खेळत राहणं महत्वाचं आहे. एक संघ म्हणून आपल्याला कोही गोष्टींसह पुढे जायचं आहे. काही खेळाडूंना विश्रांती द्यावी असं आम्हाला निश्चितच वाटलं.’

रोहित नेमकं काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, या सामन्यानंतर आणखी एक सामना आहे. त्यामुळे आम्ही तिंथे काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव खेळत आहेत. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचं झालं तर दोघेही टीम इंडियाचे वरिष्ठ आणि मत्वाचे खेळाडू आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. जसप्रीत बुमराह उपकर्णधारही आहे. दोन्ही खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल 2022नंतरही टीम इंडियाचे सामने आहेत.

विराट कोहलीला विश्रांती मिळणार?

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत सतत चर्चा होत असते. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मलिकेत दोन खेळाडूंना विश्रांती मिळू शकते. असं मानलं जात आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय ऋषभ पंत, विराट कोहली या खेळाडूंनाही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

जिंकूनही परिस्थिती बदलली नाही

तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे. असं असूनही हा संघ निव्वळ धावगतीच्या दरात खूप मगा पडला आहे. मुंबईचा विचार केल्यास रोहित शर्माच्या संघाचा तेरा सामन्यांमधला हा दहावा पराभव आहे. जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबईची सर्वात खराब कामगिरी आहे. या पराभवानंतर त्यांनी दहा स्थानावर जाण्याची शक्यता जवळपास संपुषटात आली आहे. हा संघ हंगामातील सर्वात खराब संघ असल्याचं दिसतं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.