AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट-रोहितने ओपनिंग करावी की नाही? ब्रायन लाराने स्पष्टच सांगितलं की…

आयपीएल स्पर्धा सुरु असून रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी आणि विराट कोहली आरसीबीसाठी ओपनिंग करत आहे. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या जोडीने ओपनिंग करावी की नाही असा प्रश्न समोर आला आहे. यावर माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट-रोहितने ओपनिंग करावी की नाही? ब्रायन लाराने स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Apr 08, 2024 | 8:52 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धा संपल्या संपल्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच बिगुल वाजणार आहे. आयपीएल स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आपआपल्या फ्रेंचायसीसाठी ओपनिंगला येत चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे याच जोडीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओपनिंग करावी अशी चर्चा रंगली आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने याबाबत आपलं मत मांडलं आहे. लाराने सांगितलं की, “दोन सर्वात अनुभवी खेळाडूंकडून डावाची सुरुवात करणं नकारात्मक प्रभाव पाडू शकते.” रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासाठी ओपनिंग करतो. तर विराट कोहली आरसीबीसाठी ओपनिंग आणि भारतीय संघासाठी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरतो.

ब्रायन लाराने सांगितलं की, “भारतीय संघाने एक अनुभवी आणि एक युवा खेळाडूला घेऊन ओपनिंग करावी. तर दुसऱ्या अनुभवी खेळाडूने तिसऱ्या स्थानावर उतरावं.” ब्रायन लाराने अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावं असंच सांगितल आहे. कारण रोहित शर्मा भारतीय संघासाठी ओपनिंग करतो. “कोण कोणत्या स्थानावर उतरतं याने काहीही फरक पडत नाही. त्याचं काम सुरुवातीच्या 6 षटकात 70-80 धावा करून देणं. या हिशेबाने खेळाडूची निवड करायला हवी. कोण उतरणार याने काहीही फरक पडत नाही.”

“माझ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही खेळाडू महान आहेत. पण सलामीला एक स्पॉट युवा खेळाडूला असणं गरजेचं आहे. त्यामुळे युवा खेळाडूला खेळण्याची एक उर्जा मिळेल. तर एका अनुभवी खेळाडूने मध्यक्रमातील डाव सांभाळावा. दोन्ही अनुभवी खेळाडू ओपनिंगला आले आणि झटपट बाद झाले तर नकारात्मक प्रभाव पडेल. त्यामुळे एका अनुभवी खेळाडूला ओपनिंगला आणि दुसऱ्याला तिसऱ्या स्थानावर ठेवेन.”, असं ब्रायन लारा म्हणाला.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडसोबत 5 जूनला आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी सामना होणार आहे. एप्रिलच्या शेवटी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे, हे आधीच स्पष्ट झालं आहे.

कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.