AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : इंग्लंड दौऱ्यात कमाल, या त्रिकुटाला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार!

Asia Cup 2025 Team India : इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या भारतीय संघातील त्रिकुटाला आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Asia Cup 2025 : इंग्लंड दौऱ्यात कमाल, या त्रिकुटाला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार!
Akash Deep Team IndiaImage Credit source: Shubman Gill X Account
| Updated on: Aug 06, 2025 | 1:22 AM
Share

भारताने 4 ऑगस्टला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून इंग्लंड दौऱ्याची विजयी सांगता केली. इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी आघाडी दिली. भारताने दुसरा सामना जिंकत पलटवार केला आणि मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेला तिसरा सामना 22 धावांनी जिंकत मालिकेत पुन्हा आघाडी घेतली. इंग्लंड 2-1 ने पुढे निघाली. त्यामुळे भारतासाठी मालिकेत कायम राहण्यासाठी चौथा सामना हा महत्वाचा होता. भारताने चौथा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखलं. तर केनिंग्टन ओव्हलमधील सामना अवघ्या 6 धावांनी जिंकत मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. दोन्ही संघांची ही आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या चौथ्या साखळीतील पहिली मालिका होती. दोन्ही संघांनी या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेत शानदार कामगिरी करुन दाखवली. दोन्ही संघांनी या मालिकेत बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली.

भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही मालिका 2-2ने बरोबरीत राखली. शुबमनची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका होती. शुबमनने अप्रतिम नेतृत्व केलं. तसेच शुबमनने द्विशतक, शतकासह या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने 750 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमनला त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

शुबमनने कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत हा कारनामा करुन दाखवला. तसेच यशस्वी जैस्वाल यानेही 2 शतकं ठोकत आपला दबदबा कायम राखला. तसेच इतर खेळाडूंनीही भारताच्या विजयात योगदान दिलं. तसेच या मालिकेतून कसोटी पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन याने समाधानकारक कामगिरी केली. भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार आशिया कप स्पर्धेत या तिघांना संधी मिळू शकते.

शुबमन-यशस्वीचं कमबॅक होणार!

शुबमन आणि यशस्वी ही युवा सलामी जोडी गेल्या काही महिन्यांपासून टी 20i संघातून बाहेर आहे. आता कसोटी मालिकेनंतर हे दोघे आशिया कप स्पर्धेसाठी उपलब्ध असू शकतात. बीसीसीआय सूत्रांनुसार निवड समितीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. तसेच आशिया कपसाठी भारतीय संघाची ऑगस्टमधील तिसऱ्या आठवड्यात घोषणा केली जाऊ शकते. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.