AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून संजय राऊत यांची थेट सरकारवर टीका, म्हणाले, मुंबईत..

राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यावरूनच आता संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी थेट म्हटले की, तुटवडा आहे हे त्यांनी मान्य केले पाहिजे. प्रमुख देवस्थानांनाही एलपीजी गॅस मिळत नाहीये.

एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून संजय राऊत यांची थेट सरकारवर टीका, म्हणाले, मुंबईत..
Sanjay Raut
| Updated on: Mar 17, 2026 | 10:04 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान केले. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, मराठवाडा आणि विदर्भात जास्त मदत करणे आवश्यक आहे. मग तिथे विरोधी पक्षाचे आमदार का असेना तिथेही विकासनिधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. बॅकलॉग असणाऱ्या ठिकाणी मदत करणे गरजेचे आहे. सरकार अनैतिक पद्धतीने निधी वाटप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यक्षाच्या पदावर बसलेले असता त्यावेळी तुमच्याकरिता सर्व पक्ष एकसारखी असतात मग तो सरकार असलेला पक्ष देखील. विधासभेचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष ते पूर्णपणे राजनैतिक दृष्टिकोनातून काम करतात. म्हणून कर्नाटकातील विधानसभा अध्यक्षांचा आर्दश सर्वांनी ठेवायला हवा. विधानसभाध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष पदावरील व्यक्ती निष्षक्ष असावी.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. राऊत म्हणाले की, या विषयावर महाराष्ट्रातील लोक बोलतील आणि कालही बोलले आहेत. ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती आज एलपीजी गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे.

रांगा लागलेले फोटो काय एआयने काढले आहेत का? आज मुंबईमध्ये 40 टक्के रेस्टारंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कटिंगमध्ये एलपीजी मिळत नाहीये. खाण्याच्या वडापावच्या वगैरे गाड्या असतात, त्याही 50 टक्के बंद आहेत. तुम्ही म्हणत आहात की, परिस्थिती चिंताजनक नाही, काही अडचणी नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक प्रमुख जे देवालय आहेत, काशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे.

तिथे जे अन्नपूर्णा मंदिर आहे, तिथे गेले 40 वर्ष अखंड दोन वेळा भक्तांना जेवण दिले जाते. पण आता ते अन्नछत्र एलपीजी गॅलच्या तुटवड्यामुळे बंद झालेले आहे. शिर्डीमध्येही तशीच परिस्थिती आहे. दोन लाडू प्रसादाचे द्यायचे आता ते एकच देतात. आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग निदान देवळांनातरी एलपीजी द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!