AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल, अशी असेल WTC 2027 विजयी टक्केवारी!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्यापासून झाली आहे. या सामन्याच्या चार दिवसांचा खेळ संपला असून ड्रॉकडे वाटचाल सुरु झाली आहे. शेवटच्या दिवशी एखादा चमत्कार झाला तरच निकाल लागू शकतो. अशात विजयी टक्केवारीवर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल, अशी असेल WTC 2027 विजयी टक्केवारी!
श्रीलंका कसोटी टीम Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jun 20, 2025 | 6:21 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वातील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्या सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला बांगलादेशचं पारडं जड दिसत होतं. पण श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं. बांगलादेशने पहिल्या दिवशी दोन दिवसांचा खेळ केला. यावेळी बांगलादेशने सर्व गडी बाद 495 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सर्वबाद 485 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात 10 धावांची आघाडी बांगलादेशकडे आली. यापुढे खेळताना बांगलादेशने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 3 गडी गमवून 177 धावा केल्या. चौथ्या दिवस अखेर बांगलादेशकडे 187 धावांची आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी श्रीलंकेसमोर मोठं आव्हान ठेवून 10 विकेट काढणं कठीण वाटत आहे. त्यामुळे पहिला कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल सुरु झाली आहे. हा सामना ड्रॉ किंवा एखाद्या संघाने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर कसा फरक पडेल ते

श्रीलंका आणि बांग्लादेश सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 पॉइंट मिळतील. तसेच दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी असेल. यात स्लो ओव्हर रेटसाठी पेनल्टी ठोठावली गेली तर त्याचा थेट प्रभाव विजयी टक्केवारीवर होईल. पेनल्टी 1 असेल तर विजयी टक्केवारी थेट 25 टक्क्यांवर, 2 असेल तर 16.67 टक्क्यांवर, 3 असेल तर 8.33 टक्क्यावर येईल.

श्रीलंका आणि बांग्लादेश यापैकी एका संघाने सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत मोठा फरक दिसून येईल. उदाहरणार्थ हा सामना जर श्रीलंकेने जिंकला तर 12 गुण मिळतील आणि विजयी टक्केवारी ही 100 टक्के असेल. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही शून्य असेल. जर यात स्लो ओव्हर रेट पेनल्टी असेल तर विजयी टक्केवारीवर फरक दिसून येईल. प्रत्येक एक निगेटीव्ह मार्कसाठी 8.33 टक्के कापले जातील.

त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात काय निकाल लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण विजयी टक्केवारीच अंतिम फेरीचं गणित ठरतं. त्यामुळे विजयासोबत पेनल्टी लागू नये याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. मागच्या पर्वात पेनल्टीचा सर्वाधिक फटका इंग्लंड संघाला बसला होता.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत