AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Final: अंतिम सामन्याआधी भारत पाकिस्तान कर्णधार आमनेसामने, सूर्यकुमार म्हणाला…

आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येत आहे. असं असताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने विजयासाठी उत्सुक असल्याचं सांगितलंय. तर सूर्यकुमारने खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे.

IND vs PAK Final: अंतिम सामन्याआधी भारत पाकिस्तान कर्णधार आमनेसामने, सूर्यकुमार म्हणाला...
IND vs PAK Final: अंतिम सामन्याआधी भारत पाकिस्तान कर्णधार आमनेसामने, सूर्यकुमार म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Sep 27, 2025 | 5:14 PM
Share

आशिया कप स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. 28 सप्टेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भारताने याच स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. आता विजयाची हॅटट्रीकसह जेतेपदावर नाव कोरायचं आहे. तर पाकिस्तान दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. खरं तर या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण भारतीय संघ ताकही फुंकून पित आहे. भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांना अंतिम सामन्याबाबत काय वाटतं? असे प्रश्न विचारले गेले. खरं तर या सामन्याआधी पत्रकार परिषद वगैरे झाली नाही. पण सुपर चार फेरीतील शेवटचा सामना खेळल्यानंतर दोन्ही कर्णधारांना आपला हेतू स्पष्ट केला आहे.

सूर्यकुमार यादव म्हणाला की…

सुपर 4 फेरीत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘अंतिम फेरीत दाखल झाल्याचा आनंद आहे. पण सध्या त्या बाबत काही विचार करत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूला संदेश होता की निर्भयपणे खेळा. त्यांना माहिती आहे की मला काय हवे आहे आणि त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे. त्यांना माझ्या योजना कशा अमलात आणायच्या हे माहिती आहे.’ सूर्यकुमार यादवच्या विधानातून स्पष्ट आहे की अंतिम फेरीत काहीच चिंता नाही. काय करणार हे त्याने आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच पाकिस्तानचं पूर्वीसारखं आव्हान नाही हे देखील स्पष्ट केलं आहे. कारण टी20 मधील विजय आणि पराभवाचं अंतर बरंच वाढलं आहे.

सलमान आघा म्हणाला की….

आशिया कप स्पर्धेत बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने मत व्यक्त केलं होते. सलमान आघा म्हणाला होता की, “आम्हाला आता काय करायचे आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कोणत्याही संघाला हरवण्यास सक्षम आहोत. आणि आम्ही रविवारी तेच करण्याचा प्रयत्न करू.” आता कोणाचा शब्द खरा ठरतो हे अंतिम सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. भारत जिंकतो की पाकिस्तान बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.