AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाने टाकला डाव, कर्णधार बदलून देणार क्रीडाप्रेमींना धक्का!

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अजूनही खेळायचा बाकी आहे. मात्र या सामन्यापूर्वीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटीपूर्वी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाने टाकला डाव, कर्णधार बदलून देणार क्रीडाप्रेमींना धक्का!
| Updated on: Jan 02, 2025 | 2:53 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रस्सीखेंच आहे. एका बाजूने दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. खरं तर पाचव्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला श्रीलंका दौऱ्यात आणखी जोर लाववा लागेल. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जर सिडनी कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर या मालिकेत एक सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत संधी मिळेल. असं असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. पॅट कमिन्स ऐवजी स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याची तयारी केली आहे. प्रसिद्ध सँडपेपर घटनेपूर्वी स्मिथने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे.

पॅट कमिन्सला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर आराम देण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जायचं आहे. या संघाचं नेतृत्व पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पॅट कमिन्स फिट अँड फाईन असणं गरजेचं आहे. यासाठी श्रीलंका दौऱ्यात पॅट कमिन्सला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी ही मालिका खेळणार नसल्याचं पुढे आलं आहे. ही मालिका 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आहे. कमिन्सला नुकताच मातृशोक झाला होता. तेव्हापासून तो कुटुंबासोबत वेळ घालवण्याबाबत कायम बोलत आला आहे. डेली टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने सांगितलं की, ‘तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे.मी मागच्या काही दिवसात बरंच काही गमावलं आहे. पण यावेळेस मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो.’ दुसरीकडे, निवडकर्त्याने पॅट कमिन्सच्या निर्णयाचा आदर राखत स्मिथकडे कर्णधारपद सोपण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधाना
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधानानेच उडवली खळबळ
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्... रडारवर कोणता मंत्री?
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?