AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवताना चांगलाच घाम गाळावा लागला. नेदरलँडने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने खडे बोल सुनावले.

कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..
कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Feb 07, 2026 | 3:09 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 3 चेंडू आणि 3 विकेट राखून नेदरलँडचा पराभव केला. खरं तर एक क्षण असा आला होता की हा सामना पाकिस्तानच्या हातून जातो की काय? पण फहिमने 19व्या षटकात फटकेबाजी केली आणि सामन्याचं चित्र बदललं. त्याने 19व्या षटकात 24 धावा काढल्या आणि विजय पाकिस्तानच्या पारड्यात पडला. खरं तर हा सामना सुरूवातीपासूनच पाकिस्तानच्या पारड्यात होता. त्यामुळे पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं. पण 10 व्या षटकानंतर सर्व काही बदललं. 12 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानच्या 98 धावा असताना तिसरी विकेट पडली. या विकेटनंतर सामन्याचं चित्र पालटलं. कारण लगेचच दुसऱ्या चेंडूवर उस्मान खान तंबूत परतला. त्यामुळे 98 धावांवर 4 अशी स्थिती आली. पाकिस्तानचा संघ पाहता हा विजय सहज मिळवेल असं वाटलं होतं. पण बाबर आझमच्याने विजय आणखी कठीण झाला.

बाबर आझम नेदरलँडच्या गोलंदाजांचा सामना करताना धडपडताना दिसला. त्याने 18 चेंडूत खेळले आणि 15 धावा केल्या. 18 चेंडू म्हणजे एकट्याने तीन षटकं खेळली आणि त्यात फक्त एक चौकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट हा 83.88 चा होता. त्याच्या संथगतीने केलेल्या फलंदाजीचा पाकिस्तानला फटका बसला. कारण त्यानंतर धावा आणि चेंडू यांच्यातलं अंतर वाढत गेलं. संघाच्या 100 धावा असताना बाबर आझम बाद झाला. तेव्हा 13वं षटक सुरू होतं. पण पाच विकेट पडल्याने मधल्या फळीवर दबाव वाढला. बाबर आझमच्या या खेळीमुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाही वैतागलेला दिसला. त्याने अप्रत्यक्षरित्या बाबर आझमला सुनावलं.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, ‘आम्ही पहिल्या 10 षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली, पण पाच, सहा, दोन, तीन वाईट षटके असतील तर तुम्ही खेळापासून खूप दूर जाता. पण फहीमला श्रेय जाते. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, मला वाटते की त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली.’ सलमान इतक्यावर थांबला नाही त्याने दुसऱ्या पहिल्या 10 षटकांचा उल्लेख केला. ‘मला वाटते की पहिले 10 षटकं खूप चांगली होती. आम्ही खरोखर चांगली फलंदाजी केली आणि नंतर ते विकेट खेचण्यात यशस्वी झाले. मग त्या वेळी, दबाव आला. मला वाटतं की अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याची गरज आहे.’

Follow Us
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.