AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG Semi Final : विराट कोहलीने आज ‘तो’ रेकॉर्ड टाळवाच, नाहीतर टीम इंडियाचा पराभव निश्चित!

टीम इंडियासाठी आजचा सेमी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडला पराभूत केल्यावर टीम इंडियाल थेट फायनल खेळणार आहे. मात्र विराट कोहलीचा एक रेकॉर्ड टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतो. कोणता आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या.

IND vs ENG Semi Final : विराट कोहलीने आज 'तो' रेकॉर्ड टाळवाच, नाहीतर टीम इंडियाचा पराभव निश्चित!
bumrah virat and rohit
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 27, 2024 | 6:13 PM
Share

टी-20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी फायनल काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे. टीम इंडियाला मागील सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोर जावं लागलं होतं. त्यावेळी इंग्लंड संघानेच टीम इंडियाला बाहेर करत फायनलचं स्वप्न मोडलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा अँड कंपनीला असणार आहे. या सामन्यात एक असा खेळाडू आहे ज्याने टीम इंडिया जितक्या वेळा सेमी फायनलमध्ये गेलीये तितक्या वेळा अर्धशतक ठोकलंय. आजच्य सामन्यात या खेळाडूकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मात्र हा खेळाडू असा आहे ज्याने अर्धशतकी खेळी केल्यावर टीम इंडियाला खास असं यश मिळालेलं नाही.

हा खेळाडू आहे तरी कोण? ज्याने टीम जेव्हा जेव्हा सेमी फायनलमध्ये गेली तेव्हा अर्धशतक केलं आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. विराट कोहली याने आपल्या करियरमधील पहिला टी-20 वर्ल्ड कप 2012 साली खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने एक दोनदा नाहीतर तीनवेळा सेमी फायनल गाठली आहे.

2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना झाला होता. त्या सामन्यातही विराट कोहली याने 44 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली होती. त्यानंतर 2016 मध्येही वेस्ट इंडिज आणि टीम इंडियाचा सेमी फायनल सामना झालेला. तेव्हा विराटने 47 चेंडूत 89 धावांची खेळी केल होती. मात्र त्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता. तिसरा म्हणजे 2022 साली इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलमध्येही विराटने 50 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाचा पराभव झाल होता.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याने एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. विराटने आजच्या सामन्यात मोठी खेळी तर टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमवलेला नाही.  टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सर्वांनाच  अपेक्षा आहे. कोहली आज कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?