AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचं दाट सावट, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. आता भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. 27 जूनला गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियवर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

IND vs ENG : भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचं दाट सावट, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला?
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 25, 2024 | 2:30 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार आता संपला असून आता उपांत्य फेरीचे वेध लागले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 27 जूनला हे दोन्ही सामने पार पडणार आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. मात्र भारत इंग्लंड सामन्यात तसं काही नाही. सामना संपवण्यासाठी अतिरिक्त तास मिळणार आहेत. पण पाऊस पडतच राहिला तर रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. अॅक्युवेदरनुसार, 27 जून रोजी गयानामध्ये 88टक्के पावसाछी शक्यता आहे. मेघगर्जनेसह 18 टक्के पाऊस पडेल. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं गडद सावट आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सामना सुरु होईल. तेव्हा भारतात रात्रीचे 8 वाजलेले असतील. या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? हा प्रश्न आहे.

भारत आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना संपवण्यासाठी सामन्याव्यतिरिक्त 250 अतिरिक्त मिनिटे देण्यात आली आहेत. म्हणजेच 4 तास आणि 10 मिनिटं अतिरिक्त मिळतील. यातच हा सामना संपवायचा आहे. जर पाऊस पडतच राहिला तर मात्र हा सामना रद्द करावा लागेल. दुसरं हा सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला तर मग भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण सुपर 8 फेरीत भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी भारताला पसंती मिळेल.

मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा इंग्लंडने ट्वीट करून भारताला ती आठवण करून दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीकडे आहे. कारण विजयानंतर या जोडीचं एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. राहुल द्रविडने टीम इंडियाची सूत्र हाती घेतली तेव्हा पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेला सामोरं गेला होता. तसेच कर्णधार म्हणून रोहित शर्माची वर्णी लागली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.